यांचे आजे मालोजीराजे, व वडील शहाजीराजे यांचें हें शेवटचें विश्रांति-
स्थान असल्यानें तें महाराष्ट्राला, व महाराष्ट्रीयांना केव्हाही सर्वथैव पूज्यच
व वंदनीयच आहे.
शहाजी मृत्यु पावला, त्यावेळी कर्नाटक ऊर्फ बंगलोर प्रांताची जहागीर
व तंजावर, पोटो नोव्हो व अरणी हे प्रांत त्याच्या ताब्यात होते.
त्यांपैकी अरणी प्रांताचा कारभार, वेदो ऊर्फ वेदोजी भास्कर या नांवाचा
एक ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण सरदार पहात असे. हा सरदार मोठा शूर, व
शहाजीच्या अतीशय विश्वासांतील होता; व तो पुढे रघुनाथपंत हणमंत्या-
प्रमाणेच व्यंकोजीचा पक्ष सोडून, शिवाजीस मिळाला. त्यास आठ मुलगे
असून, मराठेशाहीतील दक्षिण हिंदुस्थानांतील हें एक प्रसिद्ध व प्राचीन
घराणे आहे; व या घराण्यानें मराठेशाहीची पुष्कळ कामगिरी बजाविली
आहे. वेदोजी भास्कर हा शिवाजीस जाऊन मिळाल्यामुळे, व्यंकोजी हा
*अरणी हैं ठिकाण उत्तर अर्काट जिल्ह्यांत चेयाईर नदीच्या पूर्व-
किनाऱ्यावर, अर्काटपासून सोळा मैलांवर आहे. अरणी हैं एक जहागिरीचे
ठिकाण असून ती जहागीर वेदो भास्कर या नांवाच्या एका देशस्थ ब्राह्मणाच्या
घराण्याकडे आजतागायत चालू आहे; या जहागिरीत १८२ गांवें असून
तिचे क्षेत्रफळ औरस चौरस १८३ मैलांचे व उत्पन्न अजमार्से दोन लाखां-
वर आहे. येथील किल्ला पूर्वकाळी मोठा प्रसिद्ध असून तो हल्लीं मोडकळीस
आला आहे, व येथील " देवोपुरम् " हे मंदीर प्रसिद्ध, प्राचीन व
प्रेक्षणीय आहे.
तंजावर है मद्रास इलाख्यांत रेल्वेनें मद्रासपासून २१७ व त्रिचनापल्ली-
पासून ३७ मैलांवर आहे; व पोर्टो नोव्हो हें दक्षिण अर्काट जिल्ह्यांत एक
शहर व बंदर असून ते एक रेलवेस्टेशनही आहे. या शहरास
" फिरंगी पेठ, " आणि " महंमद बंदर " अर्शी दोन नांवे आहेत. हे शहर व्हेलार
नदीच्या मुखाशीं पडिचरीच्या दक्षिणेस ३२ मैलांवर असून तेथून सिलोन व
अचीनकडे अतीशय व्यापारी दळणवळण चालू आहे; व बंदर या नात्याने या
शहरास अतीशय महत्त्व प्राप्त झालेले आहे.