संबंधानें आम्ही कडक नियम पाळीत असतां, भोसल्यांच्या कुळासंबंधानें
तीनशे वर्षे जर सारखी सर्वांची व विशेषतः त्या घराण्यांची एकवाक्यता
आहे, आणि सर्व बखरकार व कागदपत तीच ग्वाही देतात तर हा प्रकार
भरपूर पुराव्याशिवाय खोटा मानता येणार नाही. " शिवाय इतर कित्येक
प्राचीन मराठयांच्या घराण्याप्रमाणेच, भोंसले हेही उत्तरेकडून दक्षिणत
आलेले मूळचे रजपूत आहेत, याविषयी आणखी एक महत्त्वाचा पुरावा
म्हणजे हा आहे कीं, खुद्द शहाजी यानेंच एके ठिकाण ( श्री सांप्रदायिक
विविध विषय; पृष्ठ २११ पहा.) आपण रजपूत लोक " असें स्वतःविषयीं
म्हटले आहे; व त्यावरून भोंसले हे मूळचे रजपूत आहेत, ही गोष्ट
निर्विवाद सिद्ध होत आहे. त्याप्रमाणेंच पूर्वी मल्हार भट या नांवाचा
एक विद्वान ब्राह्मण या भोसले घराण्याचा, मालोजीच्या काळापूर्वी,
उपाध्या होता; त्यानें आपल्या यजमानाचा उत्कर्ष व्हावा म्हणून स्वतः
उदेपूर x येथे जाऊन पुष्कळ खटपट केली होती; असा
असा उल्लेख आढळतो; त्यावरून मालोजीच्या पूर्वीच्या काळापासूनच उदेपूर येथे आप-
गांस राज्य, नाहीं तर निदान वतन अथवा जहागीर मिळेल, व आपणांस
राजकीय महत्व प्राप्त होईल, असे भोंसले घराण्यास वाटत असून, त्यासंबध
त्यांची खटपट सुरू होती, हे सिद्ध होतें. आणि भोंसले घराण्याचा उदे-
पूरच्या राजघराण्याशी अगदी निकटचा संबंध असल्याबद्दल खात्री पटते;
शिवाय “राधामाधवविलासचंपू " ह्या प्रसिद्ध, महत्वाच्या व मननीय
काव्यग्रंथांत जयराम कवी हा शहाजीचें अडनांव ऊर्फ कुलनाम " भोंसले "
अर्से देऊन वंशनाम शिसोदिया देतो; तेव्हां शिवाजोच्या राज्यारोहणकाली
पराक्रम गाजविला; त्यामुळे शाहू महाराजानें खूष होऊन त्यांना देवास व
घार हे दोन प्रांत दिले व त्यावेळेपासून हे परमार ऊर्फ पवार घराणे नर्मदा
नदीपलांकडे उत्तर हिंदुस्थानांत स्थाईक झाले.
Xउदेपूर, मेवाडची राजधानी; खांडवा - अजमीर रेल्वेवर आर. एम्.
सेक्शन ) चितोडगड या नांवाचें एक रेल्वेस्टेशन आहे, तेथून या शहरापर्यंत
आगगाडीचा फांटा नेलेला आहे.