आहे. ) तो पुढे म्हणतो:- शहाजीची छाप गोवळकोंडा व श्रीरंगपट्टण या
प्रांतावर बेमालुम बसली, व कर्नूळ वगैरे कर्नाटकांतील बहुतेक प्रांत शहा-
जीच्या हाती आले. ह्या काली महंमद अदिलशहाची सर्व मिस्त शहाजी-
महाराजावर होती. शहाजीजवळ त्या काळी साठ सत्तर हजार फौज असून
अफझलखान महम्मदशाही हा अदिलशाही सरदार व शहाजहान हे त्याला
वचकून असत. मोंगलाला सरहद्दीपलीकडे हांकून देऊन, सर्व दुष्मनांना
जमिनदोस्त करून, व कर्नाटकांतील सर्व जमिनदार वठणीस आणून शहाजीनें
महंमदशहाचें इतकें प्रेम संपादिलें कीं, तो सांवतराय या मुत्सद्यापाशीं
वारंवार म्हणे कीं, “ मेरी बादशाही शहाजीनें राखी है.” ! ( या सवित-
रायाच्या द्वारा शहाजी महंमदशहाशी पत्रव्यवहार करीत
असे. ) शिवाय कोणाच्याही हांतून झाले नाही तें कर्नाटक जिंकण्याचे काम
शहाजीनें केले, असेही महंमदशाहानें उद्गार काढिले; व सेतुबंध रामेश्वरा-
पासून रुमशामपर्यंत शहाजीच्या पराक्रमाची राय पसरून गेली. त्यानंतर
कवीनें पिन्गोडा उर्फ पेनकोंडा प्रांतावर शहाजीनें केलेल्या स्वारीचा उल्लेख
केला आहे. तालीकोटच्या ( राक्षस तागडीच्या ) युद्धानंतर विजयानगरचे
राजे पिन्गोड्याच्या किल्ल्यांत रहात असत, व त्या काली तो किल्ला कर्नाटकां-
तील दुर्भेद्यातील दुर्भेद म्हणून मानला गेला होता; तो शहाजानें मोठ्या
मर्दुमकानें हस्तगत करून घेतला, (व त्यानंतर तेलीचरो प्रांतावरही स्वारी
केली; ) पण त्याचे श्रेय आदिलशाहाच्या दरबारी त्याला न मिळतो त्याच्या
बरोबरील दुसरा सरदार यखलासखान यांस मिळाले, असे कवी म्हणतो !
म्हणजे याचा अर्थ काय १ अर्थ एवढाच कीं, मनुष्य कितही शूर असो,
पराक्रम करो, कर्तबगार असो, घाडसाचें कृत्य करो, परंतु जोपर्यंत तो
दुसऱ्याचा नौकर म्हणून मिरवितो, तोपर्यंत त्याचें तेज परप्रकाशितच राहतें;
व त्याच्या पराक्रमाचें सर्व श्रेयही त्या दुसन्याच्याच नांवाला जाते. बापाची
ही मानहानीकारक गुलामगिरी पाहून शिवाजीनें प्रथमपासूनच कोणाची
ताबेदारी न स्वीकारतां तो स्वतंत्र बाण्यानें वागूं लागला, हेच शहाजी व
शिवाजी यांच्या मघोल वैशिष्य आहे.
(५१) अल्लीखान:- मुसलमान कवी; या कवीच्या समस्येस उत्तर