विषय विशेष पूज्यबुद्धि वागत होती. इ० सन १६३७पासून मृत्युकाला
पर्यंतचा शहाजीच्या कृत्यांचा खरा इतिहास अजून उपलब्ध नाहीं. शहा-
जीचे सामर्थ्य शहाजहानच्या मानाने फारच अल्प होते; अदिलशहाच्या
माननेही फारसे बरोबरीचे नव्हते; तरी ह्या बादशांना दक्षिणेतील व्यवस्था
लावितांना शहाजीचा विचार करावा लागे, हें तत्कालीन इतिहासावरून स्पष्ट
दिसतें. शहाजोजवळ वोसपंचवीस हजार सैन्य असल्यामुळे दोघानाही
त्याची भीती वाटत होती; सन १६३७च्या पुढे शहाजीनें मनांत आणिले असते
व अदिलशहानें त्याला आश्रय दिला नसता. तर अदिलश ई तील कांही प्रांत
बळकावून बसण्याचे सामर्थ्य त्याच्या अंग होते; परंतु शहाजीचा स्वभाव
एकदेशीय व उतावळा नसून, अव्यवस्थित पुंडरणा करण्यापेक्षां, कोणत्याही
पादशहाची व्यवस्थित मनसबदारी करणे, व अब्रूनें राहणें त्याला पसंत पडलें
होते जेथे जेथें तो जाई, तेथें तथें त्याचें वजन अतोनात वढत असे, व
त्याच्याविषयी इतर सरदारांच्या मनांत मत्सर उत्पन्न होत असे. शिवाजांच्या
करितो " असे सांगितले; त्यावेळी रणदुल्लाखान म्हणाला, आपल्या राज्यास
जो कांही अपाय आहे, तो शिवाजीमुळे आहे; शहाजीमुळे नहीं. शहाजीराजे
कांहों आपल्या राज्याशीं वाईट रीतीने वागले नाहीत. कुराणांत असे वचन
आहे की, ' चांगल्यास इनाम द्यावे व वाइटास शासन कर वें' ह्या धर्म-
प्रमाणे पाहतां शहाजी राजास जी शिक्षा देण्याचे आपण फर्मावि आहे ती
शिक्षा अन्यायाची, व रद्द होण्यास पात्र आहे." रणदुल्लाखानाचें हें भाषण
एकून आदिलशहाने शहाजीस फर्माविलेली शिक्षा रद्द केली; व " शहाजा पुढे
चागले वर्तन ठेवील, याबद्दल खानास जामीन घेऊन, शहाजीस विजापूर
येथे बोलावून घेतलें, व नंतर त्याचा बहुमान करून त्याची मोठ्या इतमा-
मानें कर्नाटक प्रांती पुन्हा परत रवानगी करून दिली; अशी इकाकत राय-
रीच्या बखरीत आहे; परंतु रणदुल्लाखान हा इ. स. १६४३ मध्ये मृयु
पावला; व खवासखान व मुरारपंत यांचा आदिलशाहाने इ. सन १६३६
मध्ये वध केला; अर्थात् ह्यावेळी त्यांचे साह्य शहाजीस होणेंच मुळी शक्य
नव्हते, हे उघड आहे.