लेली दौलत जतन करण्याची उत्कट इच्छा, व ती आपल्या हातून जाण्याची
अनिवार भीति, यामुळेच अदिलशाहापासून फूटून निघून स्वतंत्र होण्याची
शहाजीस हिंमत झाली नाहीं. स्वतंत्र स्वराज्यस्थापना करण्याकरितां कर्नाटक-
मधील मांडलीकी जहागिरीवर पाणी सोडण्यास लागणारा प्रचंड स्वार्थत्याग
त्याच्याच्यानें करवला नाहीं. शहाजीच्या ठायीं राष्ट्रीय भावना नव्हती असे
नाहीं; त्याच्या ठाय प्रबळ राष्ट्रीय भावना होती; तो तेजस्वी, पराक्रमी, व
कर्तबगार वीर पुरूष होता; परंतु आशेचा लोभ, व प्रखंड स्थार्थत्यागाचा
अभाव, ह्या मुळे, त्याच्या ठार्थी राष्ट्रीय भावना वसत असूनही त्याला त्या भावनेला
मूर्त स्वरूप देनां आलें नाहीं इतकेच नाही तर, आपणाप्रमाणेच राजनिष्ठ राह-
ण्याविषयीं शिवाजीस उपदेश केल्यावांचूनही त्याच्याच्याने राहवलें नाहीं.
परंतु शहाजीची ही मनोवृत्ती व विचारसरणी शिवाजीसारख्या स्वतंत्र
विचाराच्या राष्ट्रपुरुषाला केव्हांही मान्य होण्यासारखी नव्हती; शहाजीच्या
या विचारसरणीमुळे त्याच्या मांडलीकी राज्यांत अनेक व्यंगें राहिली; परंतु
शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेंत असे एकही व्यंग नव्हते; शिवाजीच्या
स्वराज्यस्थापनेचा पाया राज्यकर्त्यांच्या मेहेरबानांवर अथवा डळमळित
मांडलांकी राज्याच्या पायावर उभारलेला नव्हता; स्वतंत्रतेच्या भक्कम पाया-
वर उभारलेला होता. शहाजीच्या मांडलीकी स्वराज्यांत स्वार्थ मिसळलेला
होता; शिवाजीचें स्वराज्य प्रचंड स्वार्थत्यागाच्या कोनशिलेवर उभारलेले
होतें.अदिलशाहाशीं मिंधेपणानें वागून स्वतःकरितां दौलत मिळविणें, मिळविलेली
जतन करणे, व ती पुढील पिढीकरितां तशीच जतन करून ठेवणें, हें
शहाजीच्या उत्तर आयुष्यातील ध्येय होतें; उलटपक्षी, प्रारंभापासूनच
कोणाचाही मिंधा न होतां, अथवा राहतो, महाराष्ट्राचा उद्धार करण्याकरितां
व महाराष्ट्रांत स्वराज्य स्थापन करण्याकरितां प्रचंड स्वार्थत्याग करून अहर्निश
उद्योग करीत रहावा, हेंच शिवाजीच्या सर्व आयुष्यभर ध्येय होतें. आपणास
स्वतंत्र स्वराज्यस्थापना करता येईल, ही गोष्ट शहाजीस शक्य वाटत
नव्हती; शिवाजीची, ही गोष्ट अशक्य नाहीं, अशी खात्री होती; शहाजीस,
आदिलशाहाबरोबरील आपल्या नेहमींच्या व्यवहारांत, त्याला 'खावंद
या घनीपणाच्या नात्यानें, नेहमींच श्रेष्ठ मान द्यावा लागत असे; शिवाजीला
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३९ )