शहाजी राजा इ० सन १६६४ मध्ये मृत्यु पावल्यानंतर तंजावरची
जहागीर त्याचा मुलगा व्यंकोजी याच्याकडेस आली. शहाजीच्या काळांत,
व पुढें व्यंकोजीच्या कारकीर्दीतही बंगळूर हॅच त्या उभयतांच्या राहण्याचें
मुख्य ठिकाण, व मुख्य ठाणे असून, मराठा सैन्याची छावणीद्दी त्याच
ठिकाणी असे. व्यंकोजीच्या कारकीर्दीत तंजावर व त्रिचनापल्ली येथील राज्य-
कर्त्यांमध्ये प्राणघातक युद्धकलह सुरू झाले, त्यांत तंजावरकर विजय राघव
नाईक याचा पराभव होऊन, तो विजापूर दरबारच्या आश्रयास गेला; व
आपणांस गादीवर बसविण्याविषयी त्यानें त्या दरबारची मदत मागितली.
तेव्हां आदिलशाही दरबारानें " तुम्ही तंजावरकर विजयराघव नायकास पुन्हा
तंजाबरच्या गादीवर स्थापन करावें;" असा व्यंकोजीस हुकूम दिला. तेव्हां
व्यंकोजी हा आपणांबरोबर बारा हजार सैन्य घेऊन विजयराघव नायकासह
तंजावर येथे गेला; व त्रिचनापल्लीकर नायकाचा पराभव करून, व त्यास
तेथून हांकलून लावून, त्यानें विजयराघव नायकास, आदिल शाहाच्या हुकुमा-
प्रमाणें तंजावरच्या राजगादीवर स्थापन केले.
तथापि व्यकोजी तंजावर प्रांतांतून परत गेला, अर्से पाहतांच विजयराघव
नायक व त्याचे भाऊबंद यांच्यामध्ये आपसांत पुन्हां गादीबद्दल तंटा सुरू
झाला; व तेथील राजाचा मुख्य प्रधान व इतर दरबारी मुत्सद्दी यांनी
त्रिमलवाडी येथे येऊन व्यंकोजी राजाची भेट घेटली; व त्यास विजय-
फिरून पूर्वाभिमुखी होऊन म्हैसूर संस्थानांतून बाहेर पडते, व मद्रास इला-
ख्यांतून वहात जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. या नदीस मुखाजवळ
अनेक फाटे फुटलेले आहेत. त्यांतील सर्वांत उत्तरेकडील फाठ्यास कोलेरून
असें म्हणतात. कावेरी नदी, म्हैसूर संस्थानांतून, मद्रास इलाख्यांत जातांना
त्रिचनापल्लीजवळ, तिचे कावेरी व कोलेरून असे दोन भाग होऊन ती तंजावर
प्रांतांतून पुढे जाऊन बंगालच्या उपसागरास मिळाली आहे. त्रिचनापल्लो
नजीक तंजावरच्या राजांनी प्राचीन काळी धरण बांधून मोठा कालवा तयार
केला आहे, तो “ मेलूरचा कालवा " म्हणून प्रसिद्ध आहे, व या कालव्या-
मुळे तंजावर प्रांतास विशेष सुपीकता प्राप्त झाली आहे.