एक हजार घोडों खरेदी केलीं; व शिलेदार बारगीर नौकरीस ठेवून त्यानें
आपला इतमाम व महत्व वाढवीत नेण्यास सुरवात केली. शिवाय तो पहिल्या-
त्याच्या घराण्याचा व भोंसले घराण्याचा अगर्दी निकटचा संबंध व घरोबा
जमला. या शेषाप्पाचा नातू दुसरा शेषाप्पा हा शिवाजीनें रायगड ही राज-
धानी केल्यानंतर, आपल्या मुलांमाणसासह रायगड येथे येऊन राहिला होता,
व रायगड येथील बाजारपेठेंत त्याचें एक दुकान होतें. या शेषाप्पाचें स्मारक
म्हणून त्याच्या दुकानासमोर एक अजमार्से पांच हात लांब व एक हात रुंद
असा एक चौकोनी दगड बसवून त्यावर एक नागाचें चित्र काढलेलें आहे;
शिवाय किल्लयाच्या पायथ्याशी वाडी येथे त्याचा एक बाग असून त्याचें
“ नाग्याबाग " हें नांव आहे. हा शेषाप्पाही आपल्या आज्याप्रमाणेच मोठा
श्रीमान्, प्रामाणिक, एकवचनी, व सत्यवादी असून शिवाजीची त्याच्यावर
अतीशय मेहेरनजर व विश्वास असे. मालोजीनें पहिल्या शेषाप्पास, आमचें
भाग्य उदयास आल्यास आम्ही तुमचें ऊर्जित करूं, असे वचन प्रमाण दिलेलें
होतें; त्यामुळे शिवाजीनें त्यास आपला जामदारखाना कामगार नेमिलें होतें,
व पुढे शिवाजीस राज्याभिषेक झाला, त्यावेळीही तोच त्याच्या जामदार-
खान्याचा कारभारी होता.
श्रीगोंदें ऊर्फ चांभार गोंदे ( गोविंद या नांवाच्या एका चांभार साधूवरून
या गांवास चांभार गोंदें हें नांव प्राप्त झाले आहे. ) हे तालुक्याचे ठिकाण
अहमदनगर जिल्ह्यांत, अहमदनगरच्या दक्षिणेस अजमार्से बत्तीस मैलांवर
व दौंड मनमाड रेल्वेच्या पिपरी या रेल्वे स्टेशनापासून रुडकेनें चार
मैलांवर आहे.
* बारगीर व शिलेदार या उभयतांच्या अर्थामध्ये महत्वाचा फरक आहे;
तो थोडक्यांत असा की, स्वतःचे घोडे व हत्यारें बाळगून एखाद्या राज्य-
कर्त्याच्या अथवा सरदाराच्या पदरी नौकरी करीत असेल त्यास शिलेदार असे
म्हणतात; आणि नौकरीस ठेवणाऱ्या राज्यकर्त्यांच्या अथवा सरदाराच्या-
नौकरीस ठेवणान्याच्या मालकांचें घोड़ें व हत्यारें जवळ बाळगून शिलेदारा-
पेक्षां कमी पगारावर नौकरी करणारा त्यास बारगीर असे म्हणतात.