"तुम्ही शिसोदें क्षत्रीय कुलांत निर्माण होऊन त्या कुलास
अनुरूप, असा अलौकिक पराक्रम केला; व हिंदु प्रजेस यवनांच्या
क्के शप्रद सत्तेतून सोडवून स्वराज्य स्थापन व स्वराज्य रक्षण
करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करून त्यांत (तुम्ही ) यशस्व
झाला हे पाहून मला पराकाष्टेचें समाधान व धन्यता वाटत
आहे. आमच्या वडिलांस (मालोजी राजे यांस ) असा दृष्टांत
झाला होता कीं, तुमच्या कुलांत शककर्ता निर्माण होऊन तो
हिंदु धर्माचें व हिंदु प्रजेचें यवनापासून रक्षण करील. हा
दृष्टांत खरा होता, हे तुम्ही आपल्या अलौकिक कर्तृत्वाने
( आमच्या ) प्रत्ययास आणून दिले. तुमच्या ठायींच्या शौर्य-
वीर्यादि अनुपम गुणांच्या योगाने आमच्या कुलाचा पुनरपि
भाग्योदय झाला आहे. ( आणि ) असा प्रतापशाली पुत्र
आमच्या उदरीं निर्माण झाला म्हणून आम्ही त्रैलोक्यांत धन्य
झालो आहों.
- शहाजीचे धन्योद्गार.
मालोजी मृत्यू पावला त्यावेळी शहाजीचें वय पंचवीस वर्षांचें असून,
त्याचा धाकटा भाऊ शरीफजी हा बावीस वर्षांचा होता; मालोजीच्या
काळांत शहाजीस बालपणापासूनच राजकीय शिक्षण मिळण्यास सुरवात झाली
होती, आणि इ० सन १६०६ पासूनच शहाजीनें मालोजांबरोबर बऱ्याच मुलुख-
गिया पाहिलेल्या होत्या. या काळांत मलिकंबर हा निजामशाही राज्याचा