निरोपानें सोंपविलें. मूर्तिजाच्या अंतकाळी शहाजी निजामशाहीत नव्हता, ही
बाब लक्षांत घेतली म्हणजे शहाजीनें शाहाचा केवढा विश्वास संपादिला होता,
ह्या विधानाच्या सिध्यर्थ ह्याहून जास्त पुरावा देण्याची जरुरी नाही. "
"राजकीय दृष्टया देशांतील लोकस्थिति व दरबारांतील पक्षस्थिति
वर्णिल्यानंतर रियासतीच्या भोवतालील राजकीय परिस्थिति सांगणे सोईस्कर
होतें. शहाजीच्या उमेदवारीच्या काळी, निजामशाहीच्या शेजाराला एकंदर चार
शाह्या होत्या; उत्तरेस दिल्लीची प्रचंड व विस्तीर्ण मोंगलाई, व दक्षिणेस
विजापूरची आदिलशाही, बेदरची बेरीदशाही व गोवळकोंडघाची कुतुबशाही.
पैको बेदरची बेरीदशाही मरणोन्मुख झालो असून कुतुबशाहांहून आदिलशाही
व आदिलशाहोहून मोंगलाई एकाहून एक बालेष्ट होत्या. सर्वांत मोंगलाई
अत्यंत बलिष्ट असून, तिचा रोख दक्षिणेतील सान्या शाह्या खाऊन टाकण्याचा
स्पष्ट व सर्वजनदृढ होता. दिल्लीच्या मोंगलांनी निजामशाहीचे मोठमोठे लचके
तोडिले असून राजू, मलिकंबर व मालोजी यांच्या कर्तबगारीने ती शाही कांहीं
काळ जिवंत राहिली होती; आणि निजामशाही वारली तर बाकीच्या शाह्या
निजामशाहीचे अनुकरण करितील असा रंग दिसत होता. तत्रापि निजाम-
शाही व आदिलशाही यांच्या आपसांत लढाया चालूच होत्या. भोवतालची
राजकीय परिस्थिति है। असल्या प्रकारची होती.
" खुद्द निजामशाहीतील अंतस्थ राजकीय स्थिती पाहिली तर तीही
वाखाणण्यासारखी नव्हती. मुख्य शहा जो मूर्तिजा उर्फ बुन्हाणशहा तो दुर्बल
असून मोंगलांनी दिलेल्या पंचवीस वर्षांच्या माराने त्याची व त्याच्या बरो
बर रियासतीची इज्जत उतरून गेलेली होती. मूर्तिजाच्या पहिल्या अमदा-
नीत राजू व अंबर ह्या दोघां दक्षिणी व परदेशी पुढान्यांनी राज्याचा पूर्व
व पश्चिम भाग अनुक्रमें वांटून घेतला होता; व मूर्तिजाला आवश्याच्या
किल्लाभोंवतील कांहीं खेडर्डी निर्वाहार्थ लावून दिली होतीं ! मूर्तिजाच्या
उत्तर आमदानीत मलिकनें राजूला जमिनदोस्त करून सर्व सत्ता आपल्या
एकाट्याच्या हातांत एकवटविली होती; व शहाला तो कस्पटासमान लेखीत
होता. शेवटीं राजूचा घरचा कांटा काढून टाकिल्यावर मोंगलाशों, व आदिल-
शहार्शी झगडण्यांत अंवर गुंतला होता. अशा आणीबाणीच्या वेळी शहाजी