अशा रीतीनें अदिलशहा व लुकजी जाधवराव हे आपल्या पक्षांत ओढून
घेतल्यावर आतां निजामशाही आपणास सहज पालथी घालतां येईल असें
शहाजहान यांस वाटू लागलें, व तो निजामशाहाची राजधानी जे अहंमद-
हान हा निजामशाहीवर स्वारी करून येणार आहे, हां हकीकत मूर्तुजा निजा-
मशहा यांस कळतांच त्याच्याशी सामना करण्याची तयारी फर्माविण्याच्या
इच्छेनें मूर्तिजानें व मलिकंबर यानें रियासतीतील प्रमुख प्रमुख सरदारांस
सदरेस बोलावून एक मोठा दरबार भरविला. त्या दरबाराला लुकजी जाधवराव,
शहाजो, शरीफजी व विठोजी राजाचे आठही मुलगे, जाधवरावाचा मुलगा दत्ताजी,
खंडागळे वगैरे सरदार मंडळी हजर राहिली होती; भोंसले व जाधव मंडळी
यांच्यांत कित्येक वर्षांपासून वितुष्ट असून ते जगजाहीर होते; दरबार खलास
झाल्यावर सर्व सरदार मंडळी आपापल्या लवाजम्यानिशीं परत जाऊं लागली;
त्या दाटणीत भोंसले पक्षाच्या खंडागळे यांचा इत्ती बेफाम होऊन त्यानें
जाधवाकडाल कित्येक पाईक चिरडले; तेव्हां लुकजी जाधवरावाचा मुलगा
दत्ताजी यानें संतापून तो इत्ती ठार मारला; हे पाहून खंडागळे व जाधव
यांच्यांत झटापट सुरू झाली; भोसल्यांनी खंडागळ्याची बाजू उचलली;
विठोजीचे आठी मुलगे त्याच्या मदतीस धांवून आले; " तुम्हास मध्ये लुड-
वूड करण्याचे कारण नाहीं, " म्हणून दत्ताजी ओरडला, व त्यानें त्वेषानें
भोसल्याकडील पुष्कळ लोकांस जखमी केले; त्या दंगलींत विठोजीचा वडील
मुलगा संभाजी याच्या हातून दत्ताजी जाधवराव ठार झाला ! ही बातमी ऐकून
लुकजी जाधवराव तात्काळ त्या ठिकाणी आला, व त्याने संभाजी भोंसल्या-
वर चाल करून त्यास तात्काळ जागच्याजाग ठार केलें; लुकजी जाधवराव
संभाजीवर चाल करून जात आहे, हे पाहिल्याबरोबर जाधवरावाचा जांवई
शहाजी हा संभाजीच्या मदतीस घांवला; तेव्हां त्यासही लुकजी जाधवरावानें
पट्टयाचा वार करून मूच्छित केले; मूर्तुज्जा निजामशहा, हा शहाजीवर पुत्रा-
प्रमाणे प्रेम करीत असे; त्याला ही हकीकत समजल्याबरोबर तो तावडतोब
त्या ठिकाणी आला; लुकजी जाधवरावास दोष देऊन व त्यास चार शहाण-
पणाच्या गोष्टी सांगून ही मारामारी थांबविली; परंतु मूर्तुजाशहानें शहाजाच