मूर्तुजा निजामशहा हा हलक्या कानाचा, अस्थीर मनाचा, अशाश्वत बुद्धांचा
व दुबळ्या कर्तृत्वाचा असा 'नालायक राज्यकर्ता होता; व मलिकंबरच्या मनांत
शहाजीविषयों वैमनस्य उत्पन्न झालेलें होतें; त्यामुळे मलिकंबरच्या बगल-
बच्च्यांचें, दोस्त, भगत व हस्तकांचें, व शहाजीच्या हितशत्रूंचे चांगलेच फावून
त्यांनी शहाजीविरुद्ध खटपटी आरंभिल्या; आणि जरी भातवडी येथील
युद्धांत व नवरसपूरवरील मोहिमेंत शहाजीनें पराक्रम गाजवून उत्तम कामगिरी
केली होती, तरी त्यांनीं मूर्तुजाशाहाच्या मनांत असे भरवून दिलें कीं,
" भातवडांच्या युद्धांत व नवरसपूर वरील मोहिमेंत वास्तवीकरित्या शहाजीनें
विशेष पराक्रम केला नसून खरें कर्तृत्व व खरा पराक्रम खेळोजी राजे
भोंसलें यानेंच केलेला आहे; " अर्थात ही गोष्ट शहास खरी वाटली, व त्यानें
नवरसपूरच्या मोहिमेवरून विजयी निजामशाही सैन्य परत आल्यावर शहा-
यांस गाण्याचा फार नाद होता; म्हणून त्यानें इल्लीं ज्या ठिकाणीं तोखें हा
गांव आहे, तेथें इ० सन १५८८ मध्ये “ संगित महाल " व नारी
महाल " असे दोन महाल बांधिले व त्यांस त्यानें अनुक्रमें नवरस
महाल व " सुंदर महाल " अशीं नांवें ठेविलीं. यापैकी " सुंदर महाल
हा त्याची सुंदर या नांवाची राणी होती तिच्याकरितां त्यानें बांधिला होता;
या बादशदास गाण्याचा अतिशय नाद असल्यानें त्याच्याजवळ पुष्कळ गवई
होते, व त्यानें त्यांना चांगली वेतनें करून देऊन आपल्या आश्रयाला ठेविले
होतें; व त्या लोकांस राहण्याकरितां म्हणून तेथेंच आपला वजीर शहान-
वाजखान याच्या देखरेखीखालीं इ० सन १५९८ मध्ये नवरसपूर हे गांव
वसविलें. विजापूर येथील प्रसिद्ध अवलिया मिरानी शमशुल ओशाख याच्या
वंशांतील पाँचवा पुरुष हजरत मौलाली हुसेनी यांस दिल्लीचा बादशाहा महं-
मदशहा यानें इ० सन १७३३ मध्ये बोबलाद, कोरहाल, व उपरीनिर्दिष्ट
तोरखें हा गांव इनाम दिला तो आज तागायत त्याच्या वंशजाकडे चालत
आलेला आहे. मलिंकंबर याने नवरसपूर हैं गांव जाळून पौळून खाक केल्या
नंतर लवकरच इब्राहीम अदिलशहा मृत्यू पावला; व त्या दिवसापासून तो
हा कालपर्यंत हे गांव अगदी वैराण होऊन राहिले आहे.