सूत्र बांधून मूर्तिजाचें मन आपणाकडे वळवून घेतलें, व नंतर लवकरच
तो पुन्हां अदिलशहास सोडून निजामशाही पक्षास येऊन मिळाला. +
इतक्यांतच मध्यंतरी, इ० सन १६२६ मध्ये आपल्या वयाच्या ८० व्या
चर्षी मलिकंबर मृत्यू पावला; X आणि शहाजी हाच सर्व निजाम-
शाही राज्याचा सूत्रचालक बनला. त्यानें साबाजी अनंत या मुख-
दयाच्या मार्फत निजामशाहाची आई व निजामशहा यांना आपल्या
बर्चस्त्रकक्षेखाली आणिलें; व सर्व निजामशाही राज्याचा तो स्वतःच
कारभार पाहू लागला. इकडे मलिकंबर मृत्यू पावल्याबरोबर शहाज-
दान बादशहानें जाधवरावाच्या मदतीने निजामशाही राज्याबरोबर पुन्हां
मोठ्या निकरानें युद्ध सुरू केलें; आणि मोंगल सैन्य निजामशाही प्रदेशाची
सारखी लांडगेतोड करीत मोठ्या धडाडीनें राजधानीवर चाल करून आले.
त्यावेळी त्या सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही अशी शहाजीची खात्री
झाली; तेव्हां तो विचारांत वेळ न दवडितां मूर्तुजा निजामशहा व त्याच
+ मलिकंबरचें व शहाजीचें वैमनस्य आल्यावर शहाजी अदिलशाही पक्षास
जाऊन मिळण्याच्या विचारांत होता; परंतु इतक्यांतच मलिकंबर अजारी
पडून मृत्यू पावला, म्हणून शहाजी अदिलशाही पक्षास जाऊन न मिळतो
निजामशाही राज्यांतच राहून त्या राज्याचा सूत्रचालक बनला, असाही
कित्येक ठिकाणी उल्लेख केलेला आहे.
xअहंमदनगर जिल्ह्यांतील शेवगांव तालुक्यांतील शेवगांव-तिसगांव
सडकेवरील अमरापूर या गांवीं मलिकंबर याची कबर आहे; व अहंमदनगर-
जवळील आगड गांव में औरंगझेबाचें मृत्युस्थान असून तेथे त्याचा दर्गा आहे;
अहंमदनगर येथे शहराबाहेर भुईकोट किल्ला, भिस्तबाग, फण्याबाग, बाग-
रोजा वगैरे प्रेक्षणीय स्थळे असून नगर भिंगारपासून पांच मैलांवर शा
डोंगरावर "चांदबीबीचा महाल" या नांवाची एक दगडी इमारत असून
तही मोठी प्रेक्षणीय आहे.