शहाजी हा जिजाबाईस शिवनेरी येथें ठेवून फलटणकडे वळला न. वळला तोंच
त्याच्या पाठलागावर असलेला जाधवराव त्या ठिकाणी येऊन दाखल झाला.
तेव्हां त्यास, जिजाबाई शिवनेरी किल्लयांत असल्याचे समजलें; पण शहाजी-
सविषयोंच्या द्वेषामोत त्याचें अपत्यप्रेम नष्ट झाल्यासारखें असल्यामुळे आपली
स्वतःची मुलगी हो त्याला शत्रूप्रमाणेच वाटत होती; तिचा कोणत्याही
प्रकारें अपराध नम्रतां, " ती शहाजीची स्त्री " याच अपराधाचें प्रायश्चित
तिला अन्यायाने भोगावे लागत होते आणि किल्लयांत जाऊन आपल्या
मुलीची भेट घेण्याचीही त्याला इच्छा नव्हती; परंतु बरोबर असलेल्या
मंडळींनी त्यास जिजाबाईची भेट घेण्याविषयी आग्रह केला; आणि "शहाजीचें व
तुमचें वैर असले तरी तुमच्या मुलीनें कांहीं तुमचा तिळमात्रही अपराध
केलेला नाहीं; तेव्हां तिला भेटून तुम्ही तिचा समाचार घेणे योग्य आहे, "
असा उपदेश केला तेव्हां जाधवरावाचें मन ठिकाणावर आलें; व त्यास
आपल्या मंडळींनी दिलेला सल्ला पटून त्याने आपल्या मुलीची भेट घेतली.
या प्रसंगाचें चित्र अत्यंत हृदयद्रावक आहे | शत्रूरूपानें लेखणारा, शत्रू.
प्रमाणे वागणारा, भेटीस आलेला बाप, आणि जीव जगविण्याकरितो, जिवंत
पकडले न जाण्याकरितां, नवरा टाकून गेल्यानंतर, निराधार स्थितीत आलेली
मुलगी यांच्यामधील ही दुःखदायक भेट होती ! मोगलांच्या वशिल्याने
वैभवशिखरास पोहोंचलेला पिता, आणि तिन्छाइताच्या मेहेरबानीच्या
आश्रयानें अत्यंत कष्टांत आयुष्य कंठीत असलेली कन्या, यांच्या मधील ही
दुःखदायक मुलाखत होती. जाधवराव शहाजीचा वैरी होता; आणि त्यामु
ळेंच तो आपल्या मुलीला पाण्यांत पहात होता; पण मुलीला पाहिल्याबरो-
बर त्याच्या दगडी वाटणाच्या मनाला द्रव आला ! आपल्या मुलीची अशी
विश्नावस्था होण्याला आपणच कारणीभूत आहोत अशी त्याची खात्री झाली !
लहानपणी मोठ्या प्रेमानें व लडिवाळपणानें कडेखांद्यावर खेळविलेल्या आपल्या
मुलीची अशी दीन व भणंग स्थिती करण्यांत आपणच प्रवर्तक आहोत, याब-
द्दल त्यास पश्चात्ताप वाटला ! आणि त्याने तिला "माहेरी शिंदखेड येथे
चलावयाचें काय १" म्हणून विचारिलें. पण तिनें लागलीच "मला माहेरी
यावयाचे नाहीं." असा जानवरावास खडा जबाब दिला. तेव्हां जाधवराव
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६७)