ती प्रसूत झाली व तिला मुलगा झाला.* तोच मराठी साम्राज्य संस्था
पक छत्रपति शिवाजी हा होय.
शहाजाने निंबाळकरामार्फत अदिलशाही राज्यांत अगोदरपासूनच संधान
जमवून ठेविलें होतें; शिवाय अदिलशाही राज्याचा कारभारी मुरार जगदेव,
व सेनापती रणदुल्लाखान यांच्याकडे मुद्दाम आपल्या विश्वासांतील
बाळकृष्णपंत हणमंते यांस पाठवून त्या उभयतांशीं सख्यत्वाचं
बोलणे सुरू केले होतें तथापि यावेळी शहाजी व अदिलशहा या
परस्परांचें हेतू, परस्परांशीं संख्य करण्यांत अगदीच भिन्न होते.
शहांजीचा विचार अदिलशाही सैन्याची मदत घेऊन निजामशाही जगवावी,
असा होता; आणि आदिलशहास शहाजीची कर्तबगारी माहीत असल्यानें
त्याने त्यास निजामशाही जगविण्याकरितां जरी मदत घेण्यानें कबूल केल
होतें तरी, निजामशाही न जगली तर शहाजीच्याच मदतीनें त्या राज्यांतील
जितका प्रदेश आपणांस काबीज करून घेता येईल तितका ध्यावा, असा श
हाचा हेतू होता. आणि त्याप्रमाणे त्याने आपले कांहीं सैन्य शहाजीच्या मद-
तीस दिलेही होतें.
मध्यंतरी निजामशाही राज्यांतील भानगडी पुन्हां अधिकच जोरति आल्या;
आणि मलिकंबरचा मुलगा फत्तेखान हां निजामशाही राज्याचा सूत्रचालक
बनला. परंतु त्यांच्यांत मलिकंबराची कर्तृत्वशक्ती अथवा राजधोरण नव्हतें;
शिवाय तो गर्विष्ठ व क्रूर होता; आणि राज्यांतील सरदार मंडळीला प्रेमानें
वागवून, व आपल्या दाबांत ठेवून, राजयंत्र सुरळीत व सुव्यवस्थितपणे चाल-
विण्याची त्याच्या ठायी पात्रता नव्हती. फत्तेखान अधिकारस्थानापन्न झाल्या-
वर त्यानें कांही काळ मोगल सरदार खानजहान लोदी याच्याशी युद्ध चाल-
विले; परंतु त्यांत त्यास यश मिळण्याची आशा न वाटल्याने त्याने लोदीशीं
* शिवाजीची जन्मतिथी शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीया ( ताo
१९ फेब्रुवारी इ० सन १६३० ) ही असल्याबद्दल एक नवा शोध
लागला आहे; परंतु त्याबद्दल अद्याप एकमत नसल्यामुळे, आम्ही या
ठिकाणी या बाबतीचा फक्फ उल्लेखच काय तो केला आहे.