नातू वसंतराव व दुसरे कित्येक आप्त इष्ट मारले गेले. ही अनर्थाची बातमी
किल्लयाबाहेर जगदेवराव उतरला होता, त्यास कळतांच तो व त्याचा मुलगा
बहादूरजी हे तात्काळ शिंदखेड येथे पळून गेले; मार्गे लष्कारांत लखूजीची
बायको (जिजाबाईची माता ) म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई ही एकटीच
होती; तिला ही बातमी समजल्या बरोबर ती न डगमगतो, तळावर असलेल्या
मंडळीसह शत्रुसैन्याच्या देखत देखत शिंदखेड येथें निघून गेली. ही कत्तल
शके १५५२ श्रावण शुद्ध १५ म्हणजे इ० सन १६३० च्या आगष्ट महिन्यांत
झाली. ( भा० इ० सं० मंडळ त्रैमासिक वर्ष १ ले अंक पहिला, व जेधे
यांची शकावली पहा.) त्यानंतर लखूजीच्या ( याचें सर्व नांव लुकजी कुफजी
यादव असे असल्याचें " मराठ्यांच्या इतिहासाची साधनें " खंड १५
" शिवकालीन घराण्यांचे पत्रव्यवहार " लेखांक ३ पान १३ वर लिहिलेले
आहे. ) सरदारकीस ओरस वारस न राहिल्यामुळे मोंगल बादशाहानें ती
सरदारी त्याचा भाऊ जगदेवराव यांस दिली; व त्याच वेळीं जगदेवरावाचा
मुलगा बहादूरजी व नातू मानसिंगराव यांसही मोंगली फौजेंत निरनिराळ्या
मनसबा मिळाल्या. तथापि " मराठे कुळांचे इतिहास " भाग पहिला यांत
या घराण्यासंबंधी जी हकीगत दिली आहे त्यावरून असे दिसतें कीं
लखूजीस वारस होता; हा वारस म्हणजे लखूजीचा नातू व अचलोजीचा
मुलगा सुजनसिंग उर्फ संताजी हा होय; म्हणजे लखूजीचा मुलगा अचलोजी,
दांथी - अब ऐसा कौन षख्स है के दौलतखान ये सर्कारी और रियासतका
बंदोबस्त करे. "
"
" बसातीन-इ-सुलातीन. "
याने तारीख बादशहाने विजापूर. "
यावरून जाधवरावाची केवढी योग्यता होती, हें निदर्शनास येतें;
माहूरकर उदाजी राजे व याकूनखान हे उभयतो हिंदु मुसलमान सरदार
लखुजी जाधवाची योग्यता जाणून होते; व लखुजीच्या मृत्यूनंतर निजाम-
शाहीचे व दौलतांचे संरक्षण करण्यायोग्य असा त्याच्या तोडीचा बुद्रुक
सरदार कोणीही नव्हता, है वरील विवेचनावरून उघड होतें.