लागोपाठ घडून आल्या; त्यांपैकी पहिली म्हणजे इ. सन १६३० मध्ये
शहाजीनें विजापूरकरांचा प्रसिद्ध व एकनिष्ठ सरदार, सुपें येथील बाजी मोहिते
“ अमीरराव " पोगरवाडीकर याची बहीण नामें तुकाबाई हिच्याशीं दुसरा
विवाह केला, ही होय; या वेळेपासून ती व राजे संभाजी हीं उभयतां
शहाजीबरोबर असत. या बाईचे पोटी शहाजीस इ. सन १६३१ मध्ये
पट्टयाचे डोंगर यांच्यामधील प्रदेशास " गोदावरी नदीचे खोरें" अर्से
म्हणतात; व भिमा नदीच्या कांठच्या प्रदेशास " भिमथडी " म्हणतात.
विशेष माहिती: -
( १ ) घोडप येथें पहिल्या माधवराव पेशव्यानें त्याचा काका राघोबा
दादा याचा पराभव करून ( इ. सन १७६८ ) त्यांस पकडलें.
( २ ) गाळणे हा किल्ला पूर्वी होळकराचे ताब्यांत असून त्यांत इ. सन
१८३४ पर्यंत होळकराची टांकसाळ होती.
(३) साल्हेर हा किल्ला हल्ली गायकवाडाच्या ताब्यांत आहे; ह्या किल्ल्या-
वर मोंगल व मराठे यांच्यामध्ये इ. सन १६७२ मध्ये एक मोठी लढाई झाली.
( ४ ) मुल्हेर, मोसम नदीच्या काठीं; या ठिकाणी उद्धवस्वामीची
समाधो आहे; आश्विन शुद्ध १५ स रास होतो, त्यावेळी यात्रा भरते.
( ५ ) दिंडोरी, धामण नदीच्या कांठीं; तालुक्याचे ठाणें; पहिल्या माध-
बराव पेशव्याची आई गोपिकाबाई ही नाशीकजवळील गंगापूर या गांवों
राहण्यास आल्यानंतर दिंडोरी तालुका पेशव्यांनी तिच्या खासगी खर्चास
तोडून दिला होता.
( ६ ) गंगापूर, नाशीकपासून अजमार्से सहा मैलांवर, गोदावरी नदीच्या
तीरी आहे. येथील वनश्री आनंददायक असून या गांव गोदावरी नदीचा
धबधबा आहे; त्याची उंची सरासरी ३२ फूट असून त्यास दुधस्थळी
व गंगापुरास " गोवर्धन -गंगापूर " असे म्हणतात. येथे गोपिकाबाई इ. सन
१७६४ मध्ये राहण्यास आली; व ती तिचा काल होईपर्यंत तेथेंच राहिली.
गंगापूर येथे नदीच्या कांठी गोपिकाबाईस राहण्याकरितां एक सुंदर वाड़ा
बांधण्यांत आला होता; शिवाय नदीस घाट बांधून लहान लहान आराम-