पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/22

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रत्येकाच्या मोहिमांचे सालवार तक्ते देता आले असते तर फार उपयोगाचे झाले असते. परंतु, अस्सल ऐतिहासिक लेखांच्या कोताईमुळे तसें सध्यां करितां येत नाही. सध्या बाळाजी बाजीराव, सदाशिव चिमणाजी, रघुनाथरावदादा, विश्वासराव, जयाप्पा, दत्ताजी, जनकोजी व मल्हारराव यांच्या मोहिमांचेच तेवढे तक्ते वरती दिले आहेत. त्यावरून १७५० पासून १७६१ पर्यंत मराठ्यांच्या हिंदुस्थानभर एकंदर ठळक ठळक मोहिमा झाल्या किती, त्यांचा बहुतेक नको आंकडा खाली काढून दाखविला आहे. ।१७४९च्या डिसेंबरांत शाहूराजे वारले. १७५० च्या जानेवारीत रामराजे राज्यावर आले. मार्चएप्रिलांत प्रतिनिधि व त्यांचे मुतालिक यमाजी शिवदेव ह्यांनी बंड केले. तें मोडण्यास भाऊसाहेबांनी सांगोल्यावर (१) स्वारी केली. ही स्वारी १७५० च्या सप्टंबरांत संपली. (धा.रा. च. ५). शाहूराजाच्या मरणसमयी शिंदे, होळकर देशी आले होते; ते १७५० च्या एप्रिलपर्यंत साताऱ्यास होते. पुढे हिंदुस्थानांत बागलाण, खानदेश इत्यादि प्रदेशांतून जातांना त्यांनी, नासरजंग आर्काटाकडे गंतला आहे असे पाहून, त्याचे धोडप वगैरे किल्ले (२) काबीज केले. १७५० च्या जानेवारीत रघुनाथरावांनी गुजराथेवर आपली पहिली (३) स्वारी केली व जुलैंत ते खानदेशांत प्रकाशाजवळ आले ( लेखांक २). नासरजंग १७५० च्या डिसेंबरांत मारला गेला. मुजफरजंगाचीहि तीच व्यवस्था १७५१ च्या जानेवारीत झाली. नंतर बूसी व रामदासपंत ह्यांच्या साहाय्याने सलाबतजंग मसनदीवर आला. तो कडाप्पाहून अवरंगाबादेस परत येत असतांना बाळाजीनें अवरंगाबादेवर १७५१ च्या जानेवारीत (४) स्वारी करून (पत्रे व यादी १६१) व तेथून १५ लाख खंडणी घेऊन सलाबताला रायचूरपाशी कृष्णेवर माचीत गाठिलें व गाजद्दिन येण्याची भीती दाखवून त्याच्यापासून सडकून मुलूख हवकणार तो साताऱ्यास दमाजी येऊन पोहोंचल्याची वार्ता आल्यामुळे दोन लाखांची चिरीमिरी ( Malleson's The French in India. p. 275 ) घेऊन त्याला साताऱ्यास यावे लागले ( पत्रे व यादी १६८). इकडे नाना पुरंधरे, नागोराम मेघश्याम व वापूजी खंडेराव ह्या निवगीनी दमाजीला गड्याच्या माळावर (५) वठणीस आणिलें व ताराबाईच्या पक्षाच हातपाय मोड़न याकिले. हिंदुस्थानांत जयाप्पा, मल्हारराव व साबाजी ह्यांनी ( पत्रे व यादी १६८) वजिराच्या विनतावरून राहिलखडांत (६) स्वारी करून कादरगंजाजवळ दहा हजार रोहिला बुडविला व वजीर फत्तेच्या मसनदीवर बसविला ( पत्रे व यादी १६२ ). माचीत कृष्णेवर दिलेल्या त्रासाचा सूड उगविण्याकरितां सलावत बसीला घेऊन कोरेगांवापर्यंत आला; तेव्हां त्याला तोंड देण्यास पेशव्यांस ( ७ ) स्वारी काढणे भाग पडले. १७५२च्या जलेत शिंदे होळकर गाजुद्दिनाला (अ) घेऊन नर्मदेवर आले. इकडन बाळाजीहि औरंगाबादेवर सप्टंबरांत ( ८ ) चाल करून गेले. डिसेंबरपर्यंत सलाबताच्या राज्यांत राहन त्यांनी भालकी येथे सलावताला यथास्थित चोपलें. शिंदे होळकरांनी ( ब ) खान