पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६) शेतकऱ्यांवर कोणताही दबाव न आणता उत्पन्नाची साधने उपलब्ध असणाऱ्या व जमिनीत थेट गुंतवणूक असणाऱ्या लोकांनाच शेतसारा भरण्यासाठी बोलावण्याचा अधिकाऱ्यांना आदेश.
१७) शेतसारा भरण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तींना शक्यतोवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
१८) विकलांग, शारीरिकदृष्ट्या दुर्बल, वयोवृद्ध व नवजात बालकांच्या संगोपनाची जबाबदारी संस्थानाने घेतली.
१९) रब्बी हंगामाच्या सुरुवातीला बी-बियाणे आणि शेतीसाठी उपयुक्त वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना तगाई देण्याचे आदेश. यासाठी ५०,००० रु.ची तरतूद.
२०) दुष्काळात मोठ्या प्रमाणावर पशुधन मृत्यू पावले. उर्वरित पशुधन वाचवण्यासाठी अर्ज केलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना गवताच्या लागवडीसाठी तगाई देण्याचा आदेश.
२१) सोनगडहून आणलेल्या चारा विक्रीतील अनियमितता दूर करून कोणत्याही वशिलेबाजीशिवाय सर्व शेतकऱ्यांना योग्य किमतीत गवत मिळेल यावर वहिवाटदारांनी शिक्षक, नोधानी कामदार आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने लक्ष ठेवण्याचा आदेश. २२) खंगा येथे अन्नछत्र उघडून सरकारी खर्चाने कामगारांच्या

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / १८