मारून त्यास अगदी जर्जर करून सोडिलें व शेवटीं त्यास
त्या प्रांतांतून हांकूनही लाविलें; नंतर पुढे कांही दिवसांनीं
चरत्सिंग आजारी पडल्यामुळे लढाईसारखी मोठ्या हिमतीचीं
कामे त्याच्या हातून होतनाशीं झालीं व तो अगदीं थकून
गेला होता म्हणून त्याची जहागीर 'गुजरानवाला' येथे
होती तेथें आयुष्याचे दिवस घालवावे या हेतूनें तो जाऊन
राहिला; परंतु थोडक्या दिवसांनीं तेथें त्याचा अंत झाल्यावर
त्याचा पुत्र वरील महानसिंग हा आपली जहागीर पाहूं लागला.
त्यासमयीं त्याचें वय अवघें ११ वर्षीचें होतें;
तथापि त्यानें आपले मित्र व नातलग यांच्या साहायानें
आपली जहागीर संभाळून लाहोर येथें त्यावेळीं उत्पन्न
झालेलीं लहानसान बंड मोडून टाकिली. इ. स. १७७४ त
'झींद ' येथील राजा 'गजपतसिंग' याच्या 'राजकुवर
नामक कन्येबरोबर त्याचे लग्न झालें. हा लग्नसमारंभ मोठ्या
थाटाचा झाला; तथापि तो सिद्धीस जाईपर्यंत त्यांत अनेक
तंटेबखेडे उत्पन्न झाले होते. त्यांचा परिणाम शेवटीं
असा झाला कीं, गजपतसिंगार्ने 'नामा ' येथील 'इमीरसिंग
राजास कैद करून त्याच्या प्रांतावर स्वारी केली आणि
त्याचा बहुतेक भाग आपण बळकावून बसला.
महानसिंग फार लोभी व कपटी होता. त्यानें 'जम्मू '
प्रांत बळकाविण्याकरितां अनेक युक्त्या योजिल्या होत्या;
त्यांपैकी शेवटची युक्ति अशी होती कीं, इ. स. १७८० त
तेथील राजा मरण पावून त्याच्या पश्चात् त्याच्या गादीवर
'ब्रिजलालदेव' हा बसला. ब्रिजलालदेवास, भांगी सरदारांनीं
त्याचा कांही मुलूख बळकाविला होता म्हणून, त्यांचें पारिपत्त्य
करावयाचें होतें; याकरितां त्यानें आपल्या मदतीस महानसिं-
पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३ )