या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ७४ माझे चिंतन

संपत्तीचा धनी असूनही मनुष्य इंद्रियांचा (वासनांचा) धनी नसेल, तो चारित्र्यसंपन्न नसेल तर, चारित्र्यहीनतेमुळे, इंद्रियांवर त्याची हुकमत नसल्यामुळे, तो ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो.
 हे व्यासवचन आजही सत्य आहे. तेव्हा समाजात क्रांती घडवून नवी व्यवस्था प्रत्यक्षात आणण्याची ज्यांना आकांक्षा आहे त्यांनी प्रथम मानवाला आपल्या इंद्रियांचा ईश्वर होण्यास शिकविणे अवश्य आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. हे अवधान ठेवले तर समृद्धी हा शाप न ठरता ते वरदानच ठरेल. नाही तर मात्र तो शाप ठरेल यात शंका नाही.

नोव्हेंबर १९६८