या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
सूर्यनमस्कार साधने द्वारे ताप दूर होऊन राष्ट्राला नवचेतना निर्माण होईल यात शंका नाही व ह्या यज्ञामध्ये आपल्याही प्रयत्नांची साथ मिळेल याची खात्री वाटते. प्रस्तावना लिहिण्याइतका काही मी योग्यतेचा नाही, पण काकांनी प्रस्तावना लिहिण्याचा हट्ट धरला. माझा गौरव केला. त्यांचा मी आभारी आहे. शिवछत्रपतींच्या सारखे चारित्र्य निर्माण व्हायचे असेल तर दासबोधाला पर्याय नाही व त्यांच्या सारखं मनगट तयार व्हायचं असेल तर सूर्यनमस्कारासारखे साधन नाही. सूर्यनमस्काराची महती वेद कालापासून अनेक यती व महाज्ञानी तपस्वींनी अनुभव सिद्ध केली आहे. म्या पामरे अधिक काय प्रतिपासन करावे ॥जय जय रघुवीर समर्थ।। मेदवृद्धीतून मुक्ती दास समर्थाचा श्री. मा. वाघ १५/२/२०१५ ११