.
वळ०.कां कृष्णराव तुझ्या मनाप्रमाणें झालें ना ?
कृष्ण० – तुझ्या सारखा मित्र दुनयेंत मिळणार नाहीं.
गोपा० – बरें, आतां उगीच बसून काय उपयोग !
नायकीण येईपर्यंत आपण गंजीफा खेळूं.
वळ० — ठीक आहे, ह्मणजे वेळ तरी जाईल.
गोपा ० – कृष्णराव, पेटी कुठे आहे?
कृष्ण० – देतों ( जवळच्या पेटींतून पेटी काढून
आणून देतो. )अरे पण अद्याप मंडळी कोणी
आली नाहींत ?
वळ • – येतील आतां. ( अर्से बोलून गंजीफा खेळूं
लागतात. )
र० – ( बाजूस उभी राहून ) कसं बरं करावं?
आतां यांचें स्नेही येऊन बसले तेव्हां ही वेळ कांही
चांगली नाहीं. ( विचार करून ) मी होऊन जर
गोष्ट काढली तर न जाणो राग येईल. की काय
कोण जाणे बरं दुसऱ्या कोणा जवळून सांगावं तर
इतकं आपल्या खात्रीचं आहे कोण? त्यांतून मला
इथं येऊन आठ दहा दिवस झाले.तेव्हां शेजा-
रीपाजारी लोक तरी बरं म्हणतील कां?आईला
ही गोष्ट कळली तर तिला राग येईल.याकरि-
तां तसंही करून उपयोग नाहीं. एकदां त्याच्या-
शीं बोलणं होऊन त्यांनी मला संभाळण्याबद्दल
कबूल केल्यावर आईला समजून जरी राग आला
तर फारशी भीति नाहीं आणि तिला साफ सांग-
तां येईल की, जर तुला मजजवळ राहणं असलं