१३
तर रहा, नाहीं तर मी पाहिजे तिकडे जाईन. मा-
झ्या जन्माचं मातेरं केलंस आणि आतां मी
कृष्णरावाबरोबर राहण्याचं मनांत आणलं तर तूं
नको कां म्हणतेस? मला जसं गोड लागेल तसे
मी करीन. बहुतकरून तिनं कृष्णरावाला पा-
हिल्यावर त्यांच्या गुणावरून आई मला हो म्हणे-
ल. ( विचार करून ) जे होईल तें होवो. आपणच
त्यांच्याशी बोलण्याचा घाट घालावा.उद्यां ते
घरी आल्यावर एकांत संधि पाहून समक्ष विचारा-
वं ह्मणजे झालं. तेही चतुर आहेत. तेव्हांच समज-
तील. ( नायकीण आलीसें पाहून ) आतां फार
वेळ उभं राहून उपयोग नाहीं. ते इकडेच पहातात
तर जाताना त्यांना संकेत करून जावा. ( असें
बोलून नेत्रसंकेत करून निघून जाते. )
बळ० – ( नायकिणीस पाहून ) या चंद्राजी. बसा.
( तिला बसण्यास जागा दाखवितो.)
गोपाळ० – कां फार उशीरसा लागला चंद्राजी?
चंद्राजी— जी, वस्तादजी यायचे होते ह्मणून.
बळ०- आतां उशीर कां ?
चंद्रा० – आमची तयारीच आहे. (असें बोलून तब-
ला सारंगी वगैरे मिळवून गाण्यास आरंभ होतो.)