या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमा नाटक.
स्थळ सोलापुर शहर.
कृष्णाजीपंताचा बसण्याचा दिवाणखाना.
कृष्णाजीपंत व बळवंतराव
कृष्णाजीपंत – (मनाशीं) काय करावें? उद्योगाकडे बि
लकुल लक्ष लागत नाहीं. आणि तो जर न करावा तर
घरांत फार जाच होतो. बरें, घर सोडून परदेशी
जावें तर तिकडे फार दिवस राहिल्यानें कंटाळा ये-
ऊन परत घरी केव्हां जाईन अर्से होते. येथेंच नो-
करी करून राहवें तर ताबेदारी होण्याची मारामार.
त्यांतून आतांच्या सावकारी नोकऱ्या ह्मणजे शुद्ध
हमालीप्रमाणे आहेत. सदोदित मालकाची हांजी -
हांजी करावी लागते आणि कदाचित् तीही पत्कर-
रली असती, परंतु पगार थोडा त्यामुळे अगदर्दी लक्ष
लागत नाहीं. सरकारी नोकरीविषयीं तर नांवच
काढायला नको. कारण, हल्ली इंग्रेजी शिकलेल्यां
नामुद्धां वशिला लागतो, मग आपल्याला तर इंग्रे-
जीचा अभाव.( स्तब्ध राहतो) कांही विचार
सुचत नाहीं. अकल अगदी गुंगून गेली.परवां
बळवंतरावसुद्धां रागे भरला, पण करूं काय काहीं-
च उपाय चालत नाहीं. (विचार करून) हो, बरी