या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३. सामाजिक प्रबोधन व बहिष्कार समाज परिवर्तनाचे दुहेरी शस्त्र!



 आता कुठे महिलांचा मोर्चा त्यांच्या कार्यालयासमोर आला होता, तो नेहमीप्रमाणे पोलिसांनी अडवला होता. त्याचं सभेत रूपांतर होऊन भाषणांना सुरुवात होणार होती. भाषणानंतर त्यांचं एक शिष्टमंडळ कलेक्टरांना भेटून निवेदन देणार होतं. दौ-यावर जाणारे कलेक्टर वेळ होत असल्यामुळे अस्वस्थ झाले होते. त्यांनी चंद्रकांतला बोलावून सांगितलं.
 “चंद्रकांत, त्या तालुक्याची पाणीटंचाईची आजची बैठक माझ्यासाठी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे आणि आजच्या मोर्चाचं शिष्टमंडळ भेटीस यायला आणखी तासभर तरी लागेल. आधीच मला निघायला उशीर झाला आहे, तेव्हा तू शिष्टमंडळाला भेटून त्याचे निवेदन स्वीकार."
 “आपली तशी आज्ञा असेल तर त्याचं मी जरूर पालन करेन. पण मला असं वाटतं - आपण थांबावं व स्वत:च्या भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली येणा-या महिलांच्या शिष्टमंडळाला भेटावं. ते मराठवाड्यातले सर्वात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व सर्वमान्य गांधीवादी नेते आहेत. त्यांनी काल आपल्याला फोन करून पूर्वसूचनाही दिली आहे. महिलांवरील अत्याचाराचं, वासनाकांडाचं प्रकरण आहे. साच्या मराठवाड्यातून महिला नेत्या व कार्यकर्त्या आलेल्या आहेत, अशा वेळी जिल्हाधिकारी म्हणून आपणच शिष्टमंडळाला भेटणे योग्य राहील.”
 "आय नो, आय नो." कलेक्टर पुटपुटले.
 “पण यू आल्सो नो देंट आय अॅम स्टिकलर ऑफ डिसिप्लिन अँड क्लीपिंग द टाईम. मी समोरच्याकडून तीच अपेक्षा करतो. त्यांनी मला साडेअकराची वेळ दिली होती भेटीला. आता बारा वाजून गेले आहेत. या पुढारी मंडळींना टाईम मॅनेजमेंट नावाची गोष्ट कशाशी खातात हे माहीतच नाही."
 चंद्रकांत म्हणाला, “तसं नाही सर, भाऊसाहेबांची इथं येणारी ट्रेन दीड तास लेट आणि म्हणून-"

 "ओ. के. ओ. के. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, की तालुक्याची

लक्षदीप । ३३९