जारा नामक काव्यांत शिवाबावनी नांवाचे एक वेगळेंच
प्रकरण घालून त्यांतही त्याने शिवाजीच्या अतुल पराक्र-
माचें वर्णन केले आहे. त्यांतील पद्ये वाचून शिवाजीमहा-
राज आणि त्यांचा गुणवान् स्तुतिपाठक भूषणकवि या
उभयतांच्या संबंधानें अत्यंत आदरबुद्धि उत्पन्न होते
शिवाजीचा अवतार जर न होता, तर हिंदुस्थान देशावर
कसकसे अनर्थ ओढवले असते याचें वर्णन करितांना
भूषण कवीनें एके ठिकाणी झटलें आहे :-
कासी की कला जाती, मथुरा मसीद होती, ॥
शिवाजी न होता तो सुंत होत सबकी ॥ १ ॥
अक्षरशः खरें आहे! खरोखरच शिवाजीचा अवतार
जर न होता, तर हिंदूंच्या सुंता होऊन त्यांस मुसलमान
व्हावें लागतें. आणि येथेंत्र आह्मी असें ह्मणून ठेवत
कीं, भूषणकवीचा जर अवतार झाला नसता तर शिवाजी-
च्या सोज्वळ यशाचे इतके गोड वर्णन दुसऱ्या कोण-
त्याही कवीच्या हातून झालें नसतें !
भूषणकवि जेव्हां दिल्ली सोडून दक्षिणेत आला, तेव्हां
जो राजा खरोखरीच यवनांचा द्वेष्टा असेल त्याचा आश्र-
य करावयाचा असा त्याच्या मनाचा पक्का निश्चय
झालेला होता. इकडे छत्रपतीनीं तर यवनांचा उच्छेद
करण्याकरितां जणूं काय आपल्या हातांत वीरकंकणच बांधले
होते. मग काय विचारतां ! भूषणकवीस शिवाजीचें दर्श-
न होतांच उभयतांच्या विचारांची एकरूपता होऊन जें
त्यांचें परस्परांवर प्रेम जडलें तें अव्याहत तसेंच कायम
राहिलें. शिवाजीच्या संबंधानें भूषण कवीच्या मनांत