बाबतींत गोंधळ असतो तो दूर करण्याला असले विडंबन आवश्यक आहे.
प्रो.पटवर्धनच उपरिनिर्दिष्ट टोपेत म्हणतात--
" रुक्ष प्रदेश, नीरस भूरचना, सदा बदलणारी हवा, धबधब्याचा आवाज
वगैरे गोष्टींच्या साहचर्यामुळे वर्डस्वर्थ कवीचा स्वभाव सरळ, साधा, गंभीर, न
डगमगणारा, प्रसंगाला निमूटपणे तोंड देणारा, धिमा आणि नीरस किंवा विनोद-
शून्य झाला असे म्हणावयास जागा आहे. परंतु त्याच किंवा तशाच धबधब्यांच्या,
विजांच्या, वावटळींच्या, झंझावातांच्या संगतीमुळे शेले, बायरन यांच्या वृत्ती उद्दाम,
बेधडक मुसंडी मारणाऱ्या झाल्या असाव्या." [काव्य आणि कान्योदय, पृष्ठ २०]
वरील अवतरणांतील हेत्वाभास दाखविण्याकरितां एक कल्पित गोष्ट सांगणे
सोईचे आहे. काही मंडळी एका बार्गेत गेली असता त्यांना एक गुलाबाचे झाड
दिसले. त्यांतील एकानें गुलाबाचे एक मोठे फूल तोडून हुंगले; दुसऱ्याने एक
अर्धविकसित फूल तोडून बटनहोलमध्ये घातले; तिसऱ्याने पाकळ्या. तोडून टाक-
ण्यास आरंभ केला; चवथ्याने “ या गुलाबाचे फ्रेंच नांव कायसेंसें आहे ते काय
बरे?" असे म्हटले व डोके खाजविण्यास आरंभ केला; पांचव्याने आमच्याकडे
या फ्रैंच जातीचा गुलाब नाही, पण दुसऱ्या जातीचा आहे असे म्हटले; सहाव्याने
आपल्या मुलीकरितां काही फुलें तोडली; सातव्याने आपल्या सहचरीला एक फूल
तोडून दिले व आठव्याने गुलकंदाकरितां कांही फुलें तोडून हातरुमालांत घातली !
नववा मागे मागे रेंगाळत होता त्याचे कारण असे की, त्याला आपल्या गत
प्रियतमेच्या गुलाबी गालांची व हास्याची आठवण होऊन तो उदास झाला होता;
आणि दहावा गालातल्या गालांत हंसत तेथेच उभा होता, कारण त्याला गडकऱ्यांच्या
'गुलाबी कोड्या' ची आणि केशवकुमार अत्र्यांच्या 'प्रेमाच्या गुलकंदा' ची
त्याच वेळी आठवण झाली ! आतां प्रस्तुत गुलाबाचे झाडच तेथे नसते तर गुला-
बोच्या संबंधी या भिन्न वृत्ती व ही भिन्न कम शक्यच नव्हती; तेव्हां 'गुलाबाचें
झाड' ही परिस्थिति या सर्व कार्याचे कारण आहे. आणि यावर कोणी जर आक्षेप
घेऊ लागला की एकच कारण भिन्न कार्ये कशी घडवून आणते, तर प्रो. पटवर्ध-
नांप्रमाणे 'स्वभावभेदामुळे ' हे उत्तर सांगून मोकळे व्हावे ! उपरिनिर्निष्ट दहाहि
कायें गुलाबाच्या झाडाच्या अभावी अशक्य होती, तेव्हां या अर्थाने ते झाड
'कारण' या संज्ञेस पात्र असले, तरी या झाडामुळे ही कार्ये घडली या म्हणण्या-
७