पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/256

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २५१ वर शंकाराचार्यांचा आक्षेप असा की, जरी सत्त्व वगैरे मध्ये ही पात्रता असली, तरी बाह्य कारणाच्या अभाव त्यांच्या मध्ये विषमता केव्हाही उत्पन्न होणार नाही. आणि जर ही विषमता त्यांच्या मध्ये एकदा उत्पन्न झाली तर, बाह्य कारणाच्या अभावीं, ती केव्हांही नष्ट होणार नाहीं. आणि जरी हा आक्षेप एकीकडे ठेविला, तरी प्रधान चैतन्यरहित असल्या मुळे प्रधानवादाच्या विरुद्ध जे आक्षेप पूर्वी निर्दिष्ट केले आहेत ते सर्व कायम राहतातच. आणि ते सर्व आक्षेप टाळण्या करितां, सर्वज्ञ सर्वशक्ति अशा ईश्वराची विद्यमानता सांख्य कबूल करितील, तर मग शंकरोचायचा त्यांच्याशी वादच राहणार नाहीं ':-अथ अपि स्यात् । अन्यथा वयं अनुमिमीमहे यथा न अयं अनन्तरः दोषः प्रसँज्येत । न हि अनपेक्ष–स्वभावाः कूटस्थाः चे अस्माभिः गुणाः अभ्युपगम्यन्ते ।....चलं गुणवृत्तं इति च अस्ति अभ्युपगमः । तस्मात् साम्य-अवस्थायां अपि वैषम्य-उपगम-योग्याः एव गुणाः अवृतिष्ठन्ते इति । एवं अपि प्रधानस्य ज्ञ-शक्ति-वियोगात् रचना-अनुपपत्ति ( १ ) निरपेक्षेषु गुणेषु गुण-प्रधान-भाव-अनुपपत्तौ अपि इति यावत् ॥ ( आनंदगिरि ) ( २ ) अनन्तर: दोषः महत्-आदि-कार्य-उत्पाद- अयोगः ॥ ( आनंदगिरि ) | ( ३ ) गुणानां अंग-अंगिरव-अनुपपत्त्या महत्-आदि-कार्यअनुपपत्तिरूप: दोषः यथा न भवति, तथा मिथः अनपेक्षत्व-लक्षणस्वभावात् अन्यथा प्रकार-अन्तरेण गुणान् अन्योन्य सापेक्षान् एवं कुल्पयामः । अतः न प्राक्-उक्त-दोष-प्रसक्तः इति उक्तम् ॥ ( आनंद्रगिरि )