पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/52

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपोआप स्वतःस त्या ओळींवर... तिच्या कसोटीवर पारखू लागतो. हे असतं कवी नि वाचकांचं एक होणं, हे जिथं घडतं तिथंच कवितेचं भिडणं होतं. तेच कवितेचं यश होऊन जातं.

 ज्वाला आणि फुले' मधील कविता म्हणजे बाबा आमटेंच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या पंचशीलाचं खुलं समर्थन. त्यामुळे बाबा आमटे अध्यात्माऐवजी विज्ञान श्रेष्ठ मानतात. आचार्य विनोबांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करूनही त्यांचं सूक्ष्मात जाणं, अतींद्रिय होणं बाबांना पटत नाही.

 ‘जग उड्डाण घेत असता

 अजूनही तुझी प्रज्ञा स्थितच का?'

 असा प्रश्न करून स्पष्ट बजावतात

 ‘स्थितप्रज्ञ नको आहेत आज

 आकाशगामी प्रज्ञामती हवे आहेत आता

 ‘पंखांना क्षितिज नसते' कवितेतील हा संवाद म्हणजे बाबा आमटेंच्या विचार स्पष्टतेचा दाखला. कवीचं तत्त्वज्ञान यातून स्पष्ट होतं. धर्म, अध्यात्मासारख्या गोष्टी अफूची गोळी असते तशी व्रतबद्धतेची शृंखलाही असते ती. ती माणसास आत्मवंचक बनवते. त्यामुळे माणूस अभागी, अभावपूजक होतो. माणसापुढे आदर्श असले पाहिजेत, ब्रह्मांड कवेत घेऊ पाहणा-या व्हेलेंटिना तेरेश्कोव्हा, कॉनरॅड हिल्टन यांचे उदाहरण देऊन माणूस विज्ञाननिष्ठ जोवर होणार नाही तोवर तो ‘आनंद पक्षी' होणार नाही, हे बाबा आमटे या कवितेत निःशंकपणे समजावतात. ही कविता नव्या मनूचं आवाहन होय. या आवाहनाला आकाशभेदी कर्तृत्वाचा अर्थ आहे. गाभा-यात करंजीच्या तेलाचे दिवे जाळून युगे गेली... माणसाच्या आत्म्याचे घर उजळले नाही मग विश्वाचे घर कसे उजळणार? असा प्रश्न करणारी ही कविता मुळातून वाचणे यासारखा दुसरा अनुभव नाही.

 उत्तरवाहिनी’ रचना म्हणजे गंगा विवरण! वरील कवितेच्या पार्श्वभूमीवर ‘ज्वाला आणि फुले'तील ही कविता गंगेपेक्षा श्रमगंगा कशी श्रेष्ठ ते सांगते. या कवितेत उद्याच्या श्रमयुगाचे स्पंदन आहे. यात श्रमतंत्राचा विस्तार आहे. विध्वंसाजागी विधायक बीजे पेरणारी श्रमगंगा व श्रमवीर हवे आहेत आज असे सांगणारी ही कविता वाढत्या लोकसंख्येवर श्रमानेच विजय मिळवता येईल, गंगाप्राशनाने नाही, हे पटवून देते. 'वीज वैराणातून फुलवावयाचे आहेत सौभाग्याचे द्राक्षमळे' म्हणत बाबा आमटे सांगतात - ‘गोगलगाईच्या

शब्द सोन्याचा पिंपळ/५१