पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड चव्हाण, कारभारी काशीनाथ मोठे खड्डे खणून लागवड करण्याऐवजी छोट्या खड्ड्यांसाठी त्यांनी इंग्रजी ‘एफ’ आकाराचे उपकरण तयार केले. हे उपकरण जमिनीत खोचायचे आणि धग देऊन ते जमिनीत दाबायचे व त्याने तयार झालेल्या खड्ड्यात सागाची रोपे किंवा बियाणे पेरायचे असे हे तंत्र विकसित झाले. परिणामी, जुन्या पद्धतीने एक कामगार दिवसाला जर तीनशे रोपे लावत असेल, तर नवीने तंत्राने हाच आकडा सहाशेच्या वर गेला. लागवडीसाठी असलेल्या रोपांची लगेच लागवड केली नाही तर ती वाळून जातात. यावर काका चव्हाणांना शेतकर्‍यांच्या एका गटाकडून अचानक उपाय मिळाला. हा गट रोपांना हळद, कापूर आणि हिंग यांचे मिश्रण केलेल्या पाण्यात रोपे भिजवून काढत असे, ज्यामुळे ती खूप दिवस ताजीतवानी राहत. काकांनी याचा उपयोग औरंगाबादला केला आणि हजारो रोपे लावली. आजही त्यांचे हे क्षेत्र हिरवेगार दिसते. बुलढाण्याला त्यांनी जनावरांचे खाद्य असलेल्या गवताचे उत्पादन वाढवले आणि राज्याची मागणी पूर्ण करून तिथले गवत दुष्काळग्रस्त गुजरातला पुरवले. यात आर्थिक फायदा तर झालाच; पण स्थानिक लोकांनाही चांगले उत्पन्न मिळाले. शासनाने काकांची बदली गोंदियाला केली. गोंदिया हा घनदाट जंगलाचा भाग! तिथे फार मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत होती. तातडीचा उपाय म्हणून त्यांनी फिरत्या जीपने गावांत जाऊन ध्वनिवर्धक लावून ‘जंगल तोडू नका’ असे आवाहन ग्रामस्थांना केले. हा उपक्रम ‘वनवाणी’ म्हणून नावाजला गेला. याच भागातल्या कोळसा खाणींना उत्पादन प्रक्रियेचा भाग म्हणून बांबूच्या चटयांची जरूर भासे. उत्पन्नाचे एक साधन या अनुषंगाने स्थानिक जनता अशा चटया विणून पुरवठा करत असे. चटयांसाठी बांबू आवश्यक असल्यामुळे जंगलात भरमसाठ अनधिकृत बांबूतोड होत असे. काकांनी लोकांना अधिकृतरीत्या तोडणीला आलेला बांबू पुरवला. तसेच लोकांना चटया विणण्यासाठी मिळणारी मजुरी प्रति चौरस फूट ६ पैशांवरून २२ पैसे करून दिली. विशेष नोंद करण्याजोगी बाब म्हणजे काकांच्या या प्रयोगामुळे वनउत्पादनाच्या कायदेशीर यादीत चटयांचा समावेश झाला. त्याआधी फक्त बांबू हेच वनउत्पादन समजले जात होते. काका चव्हाण यांनी प्रशासकीय सेवेत दिलेली योगदानाची यादी मोठी आहे. आता देशभर माहीत झालेले ‘सुबाभूळ’ या नगदी पिकाच्या पहिल्या लागवडीचे श्रेय चव्हाणांचे आहे. एकदा वनखात्याकडे सागाची पन्नास लाख रोपे जास्तीची होती. काकांनी ती लोकांना फुकट वाटली आणि जिथे शक्य आहे तिथे ती लावण्यासाठी लोकांना उद्युक्त केले. परिणामी, अनेकांनी स्वत:च्या जमिनीवर पारंपरिक पिकाऐवजी सागाची लागवड केली. आज लोकप्रिय झालेली ‘सामाजिक वनीकरणा’ची कल्पनाही त्यांचीच आहे. सामाजिक वनीकरणाच्या वनखात्यातील वेगळ्या विभागाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. डोंगर उतारावर चर खणून “पाणी अडवा, पाणी जिरवा” या चळवळीचा पायाही चव्हाणांनी घातला. एकूणच आपल्या शासकीय सेवाकालात आंतरिक विरोध पत्करूनही वनखात्यात अनेक नावीन्यपूर्ण कल्पना अमलात आणून काका चव्हाण सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक या पदावरून शिल्पकार चरित्रकोश