खास आहे, होय ना?"
"असेल."
" म्हणजे मला त्याबद्दल प्रश्न विचारायचा हक्क नाही असंच ना?"
तो दुखावला गेला होता. म्हणजे त्याच्या बिनधास्त आवरणाखाली त्याला काळजी, असुरक्षितता वाटत होती तर. म्हणूनच तो आला होता तिला भेटायला. आईबापांपासून कितीही दुरावला असला तरी त्यांच्या अस्तित्वाचा त्याच्या आयुष्याला एक संदर्भ होता. तो स्वत: बदलला असला तरी हा संदर्भ बदलला नव्हता. आणि तो बदलू नये असंच त्याला वाटत होतं. रामनं त्याला झाडून टाकायचा प्रयत्न केला होता तसाच ज्योतीनं केला. आमच्यातलं नातं हा आमचा प्रश्न आहे, त्यात तू नाक खुपसू नको असाच तिच्या म्हणण्याचा अर्थ होता. पण खरं म्हणजे असं म्हणण्याचा तिला अधिकार होता का ? मुलं झालेल्या माणसांना असतो का?
ती म्हणाली, "नाही, तसं म्हणायचं नाहीये मला. तुला विचारायचा हक्क आहे, जरूर आहे. फक्त तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. माझ्यापाशी सुद्धा काही उत्तर नाहीये अजून. म्हणूनच मी इथे एकटी आलेय, सगळ्या गोष्टींचा नीटपणे विचार करायला."
" असं. पण हे झालंय ते का झालं?"
" आत्ता एकाएकी काही झालं नाही, बरेच दिवस चालू आहे. अनेक गोष्टी मला पटत नाहीत, मी स्वीकारू शकत नाही. प्रताप, हे बघ, आत्ता खरोखरच मला कशाबद्दल बोलावं, ऊहापोह करावा असं वाटत नाहीये. पुन्हा कधीतरी आपण बोलू."
" ठीक आहे. तुझी मनःस्थिती मी समजू शकतो. मग मी जाऊ आता ?"
" आलाच आहेस तर आजचा दिवस राहून उद्या का नाहा जात? मी खोलीत तुझ्यासाठी कॉट टाकायला सांगते."
" ओ. थँक यू ममी. कधी नव्हत ते मला महाबळेश्वरमधे
पान:साथ (Sath).pdf/120
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११२: साथ