हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सुरुवातीला ज्योतीला आपल्या नव्या आयुष्यात मजा वाटली. शिरगावमधे त्यांची कुणाकडे ऊठबस नव्हती. सोशल लाइफ असं नव्हतंच त्यामुळे पुण्यात आल्यावर नवनवीन लोक भेटणं, त्यांना जेवायला बोलावणं, त्यांच्याशी बी, खतं, पाऊस, दुष्काळ आणि सरकारची शेतीविषयक धोरणं हे विषय सोडून इतर विषयांवर गप्पा मारणं यात ती खूप रस घेत असे. शिवाय नाटकं, सिनेमे, मैफली, पुस्तकं वाचणं हेही तिला आवडायचं. तिच्या आयुष्याला एकदम नवीन परिमाण लाभलं होतं.
 हळूहळू हे बदललं. बदल नक्की कसा घडून आला ते तिला जाणवलं नाही, पण या सगळ्या गोष्टी नुसत्या वेळखाऊ वाटायला लागल्या. त्यात आपण जो वेळ आणि जे श्रम घालवतो ते इतरत्र जास्त चांगल्या प्रकारे कारणी लावता येतील असंही वाटलं. आवडीनं करण्याऐवजी केवळ केलं पाहिजे म्हणून सगळं करता करता आपण ह्यातल्या नाही, बाहेर उभं राहून सगळं अलिप्तपणे न्याहाळतोय असा अनुभव वरच्यावर यायला लागला.
 एक दिवस ऑफिसमधून घरी जाताना रामने फुलांच्या दुकानाशी थांबून एक बराच महागडा गुलाबांचा गुच्छ विकत घेतला.
 " हे कशासाठी ?"
 " आचरेकरला द्यायला. तुला सांगितलं होतं का की त्याला हार्ट ॲटॅक आलाय म्हणून ? "
 " आपण त्यांना भेटायला जाणार आहोत ?"
 " हो."
 " राम, त्यांची आपली कुठे इतकी ओळख आहे ?"
 " अगं, ह्या गोष्टी नुसत्या रीत म्हणून करायच्या. हजेरी लावून यायचं. बास.”
 " इतक्यात व्हिजिटर्सना भेटायची परवानगी तरी आहे का?"
 " आजच दिली आहे."
 राम त्या स्पेशल रूममधे जाऊन गंभीर दुखणं झालेल्या माणसाशी एक खोटाखोटा खेळकर आवाज काढून बोलतात

साथ : १२३