हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ती हॉस्पिटलमधे असताना रामने तिला विचारलं, " हा मुर्खपणा तू कशासाठी केलास? काय मिळालं तुला त्यातनं ? तुला काय वाटतं लोक तुला फार शूर समजत असतील म्हणून ? "
 स्मिता काहीच बोलली नाही. तिनं फक्त रामकडे अशा नजरेनं पाहिलं की रामने तिची नजर जोखली असती तर तो थिजूनच गेला असता.
 ज्योती नंतर म्हणाली, " असं का म्हणालास तिला राम ? "
 " मग बरोबरच आहे मी तिला म्हटलं ते."
 " असलं तरी ते म्हणायची ही वेळ नव्हती. ती केवढया दिव्यातनं पार पडलीय. तिला प्रेमाची, जिव्हाळ्याची गरज आहे."
 "बरं, सॉरी."
 हॉस्पिटलमधून सोडल्यावर स्मिताला काही दिवस पुण्यातच ठेवावं असं डॉक्टरांचं मत होतं, म्हणजे जखम नीट बरी होतेय ना, त्यात पू वगैरे होत नाही ना ह्याच्यावर नजर ठेवता येईल. रामच्या मनात होतं ज्योतीनं त्याच्याबरोबर शिरगावला परतावं. ज्वारीचं प्रोसेसिंग जोरात सुरू होतं, सरकीची विक्री अजून चालू होती. काम खूप होतं.
 ज्योती म्हणाली, " मला वाटतं मी तिच्याजवळ रहायला हवं. पोर तसं दाखवीत नसली तरी हबकली असली पाहिजे."
 " आपण काही तिला एकटं सोडीत नाहीयोत. तिची आजी आहे की तिच्यापाशी."
 पण ह्यावेळी ज्योतीनं आपला हट्ट सोडला नाही. शेवटी तो म्हणाला, "ठीक आहे. तुला रहायचं असलं तर रहा इथे. मी पुढे जातो, तू शक्य तितक्या लवकर ये " मग तो एकदम मोठ्याने म्हणाला, " गाढवपणा करायचाच होता तर तिनं अगदी हीच वेळ कशी शोधली? जणू काय आपल्याला आत्ता पुरेसे वेध नाहीत म्हणून ह्याची आणखी एक भर."
 "राम !"
  स्मिता शेजारच्याच खोलीत होती. तिला ऐकून जाईल अस बोलण्याइतका राम संवेदनाशून्य बनू शकतो याचा ज्योतीला

१४२ : साथ