मी जगत गेलो. जगण्याने मला एक छोटे शहाणपण बहाल केले आहे. जग, स्वतः जग नि जमेल तेवढं दुसन्यास जगवे. पहिल्या वाक्याचा पूर्वार्ध प्रभावी होता. मी रेसचा घोडा होतो. पळायचोच पळायचो. काळाने माझी पावलं थबकवली व अनुभवाने मनाला थांबायला शिकविले. मी आताही जगतोच. पण दुसन्यांसाठी अधिक. त्या माणसासाठी मी थांबलो होतो ना? उपकार म्हणून नाही. जाण म्हणून! माझ्या उपजत अकिंचन असण्याने सकिंचन, सकांचन होऊनही मी माझ्यातला नैसर्गिक माणूस विवेक मरू दिला नाही. म्हणून मी थांबतो, थबकतो नि दुसन्यास हात देतो. जाण काय म्हणाल तर मला कुणीतरी कधी तरी हात दिला होता. मी त्या जाणेवर जगतो. जी माणसं जाण ठेवून जागेपणी जगतात, त्यांचा न कधी कांचनमृग होतो, न कधी मिडास, न कधी शेखचिल्ली, न मुंगेरीलाल! नातं ही गोष्ट लादण्याने येते तेव्हा ती असते ओझे. तुम्ही ती आनंदाने स्वीकाराल तेव्हा त्या जबाबदारीचंही सुख असतं. ती जोखीम मानाल तर मात्र फसगत झाली म्हणून समजा. मग तुमचा प्रेक्षक होऊन जातो. नटसम्राट व्हायचं, प्रेक्षक व्हायचं की दिग्दर्शक. हे ज्याचं त्यांनं ठरवायचं?
पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/159
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सामाजिक विकासवेध/१५८