या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
आणि (सबंध) ठेवायचीपण.' ही गोष्ट तर्कशास्त्राने अशक्य म्हणून सांगितली आहे. पण ही अशक्य गोष्ट रामाने करून दाखविली. त्याने राज्य सोडलेही. आणि अगदी खुंटा हलवून घट्ट करून राज्य आपलेसेही केले. भरताने 'न उष्टवता' भरलेले ताट रामासाठी तयार ठेवले. परत येताना कौसल्या फारशी रडली नाही. रामाचा वियोग १४ वर्षे होणार होता, तो काही कमी झाला नाही. पण राज्याची जी व्यवस्था झाली, ती पाहून रामवियोगाचे तिचे दुःख कमी झालेले दिसते. ।। संस्कृती ।।