पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/145

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बौद्ध धर्म येऊन शतक उलटले होते. त्याने आपल्या कारकिर्दीत पहिला तिबेटी बौद्ध विहार स्थापला. त्यातून तिबेटमध्ये तेथील भोट भाषेत बौद्ध साहित्य भाषांतर केंद्र (स्कूल/अकादमी) विकसित झाले की ज्यानं साच्या जगाला प्राचीन बौद्ध ग्रंथ भाषांतरित करून पुरवले. त्याचे कारण एकच होते की तिबेट सर्व आक्रमण, युद्ध आदींपासून सदैव सुरक्षित राहिले आहे. असे सांगितले जाते की, तिबेट आजवर जगातली एकमेव अयुद्ध भूमी राहिली आहे... तरी दलाई लामांना ती सोडावी लागली... त्याचं कारणही बौद्ध धर्म शक्तिपीठच राहिले. असे अहिंसक शक्तिपीठ ज्याची अण्वस्त्रांवर बसलेल्या चीनी राजसत्तेसही दिवाभिती वाटत रहायची... आजही ते शीतधर्मयुद्ध दलाई लामांच्या उत्तराधिकारी वादामुळे धुमसत आले. परत हाही बौद्ध संस्कृतीचा शांत, अहिंसक विजयच ना? तो तिबेट आठव्या शतकापासून अनुभवतो आहे. हे सारे आज वाचत, मनन करत राहताना मानव विकासाचे जे आकलन होत राहते ती डॉ. राहुल सांकृत्यायन सारखं समाधिस्त, बुद्धिवादी महापंडिताची साहित्य साधना समजावत राहते की, काळ प्रतिकूल प्रत्येक क्षणीच असतो. तुम्ही प्रतिक्षण अहिंसा अनुकूल, सहिष्णू आहात का? ती तुमची धर्म वृत्ती आहे का? अन्यथा वैदिक धर्म लोपला नसता.

 मंगोलियामध्ये बौद्ध धर्म पोहोचवला तो महापंडित आनंदध्वजांनी. तोही तेराव्या शतकात. तेथून विसाव्या शतकापर्यंत म्हणजे सन १९४६ पर्यंतचा. मंगोलियाचा इतिहास ज्यांना समजून घ्यायचा आहे, त्यांना ‘बौद्ध संस्कृति' ग्रंथासारखा दुसरा दीपस्तंभ नाही. डॉ. सांकृत्यायन जागोजागी आपल्या ग्रंथात कोष्टके, सूची, अभिलेख उद्धरणे, वर्णने, पत्रे, चरित्रे, इतिहास देत आपले तपशील सर्वसंदर्भयुक्त बनवत राहतात. ते वाचताना या महापंडिताची (डॉ. सांकृत्यायन) बहुश्रुतता चकित करीत राहते. या महामानवाची गती कोणत्या प्रांतात नाही? बौद्ध धर्माचा उतार काळात मंगोलियात त्याने प्रवेश केला. तरी तो तरून आहे नि तरुणही! मंगोलियाचा प्रत्येक नागरिक स्वतःस भारताचा ऋणाईत मानतो. त्याचे वर्णन करताना डॉ. राहुल सांकृत्यायनांनी या ग्रंथाच्या 'उपसंहार' मध्ये (पृ.५३१) स्पष्ट केले आहे की, “शाक्यमुनि लुंबिनी में पैदा हुए, वज्रासन (बोधगया) में बुद्धत्व प्राप्त किए, वाराणसी में उन्होंने प्रथम धर्मोपदेश दिया और कुसीनारा (कसाया) में महापरिनिर्वाण प्राप्त किया। आज भी बइकाल तट पर कितने ही वृद्धवृद्धायें मिलेंगे, जो मरने के बाद भारतवर्ष में जन्म लेने की लालसा रखते है। वहाँ कितने ही तरुण विद्यार्थि मिलेंगे, जो दिंगनाग और धर्मकीर्ति

साहित्य आणि संस्कृती/१४४