आहे,कामाचा दुष्काळ अजिबात नाही हे मला स्पष्ट दिसते.हा माझ्या आयुष्यभराच्या अनुभवाचा सारांश आहे.
११.२२ या समानतेच्या भावनेवर,आपण एकाच शरीराचे अवयव आहोत या भावनेची भारतीय तत्त्वज्ञानाच्या मूळ सूत्रांशी गाठ बांधलेली आहे.बदल माझ्यापासून सुरू व्हायला हवा.मी बदललो की आम्ही आपोआप बदलू.म्हणूनच मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसांना जोडून संघटना बांधण्याच्या
व राष्ट्रीय दानतसंपन्न नागरिक घडवण्याच्या प्रयत्नांचे आकर्षण आहे.भारतीय समाजात रक्ताच्या किंवा लग्नाच्या नात्याबाहेरच्या माणसांची संघटना,कुटुंबाबाहेरच्या माणसांची संघटना,जातीपलीकडची संघटना हा विचार नवीन आयात केलेला आहे.म्हणूनच परदेशस्थ भारतीयांना तो ओळखीचा वाटतो.ह्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेलेले नाही.संघाने पचवलेला हा पाश्चात्य विचार आहे.
११.२३ भारतातले सध्याचे राजकीय पक्ष,संघटना, युनियन्स,कंपन्या,स्वयंसेवी संस्था,ह्या साऱ्या पाश्चात्य कल्पनांची कलेवरे आहेत.त्यांच्या घटना आहेत,पदाधिकारी आहेत,हिशोब आहेत,ऑडिट्स आहेत, मिनिटबुके आहेत.पण ती सारी वरवरची व्यवधाने आहेत.त्यांच्यातला सत्ताव्यवहार हा मात्र हिंदू
एकत्र कुटुंबासारखा असतो.त्या संघटना नाहीत.अजूनही सत्तासंबंध जन्माने ठरतात.संघटनेचे प्राणतत्त्व अजूनही व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांतच गुरफटलेले दिसते.संघटनेतली पदांची प्राणप्रतिष्ठा आम्ही शिकलेलो नाही.ते महत्त्व आमच्या भारतीय मुशीत ओतले गेलेले नाही.त्यासंबंधींच्या विचारांना चालना
मिळावी हाही या लेखनाचा हेतू आहे.
११.२४ ही वैयक्तिक पार्श्वभूमी विस्ताराने लिहिण्याचा हेतू हा आहे,की येथून पुढे लिहिलेले अनुभव हे एका व्यक्तीचे अनुभव व प्रयत्न आहेत.त्याला पूर्ण भारतीय वळण आहे.पहिल्या दहा प्रकरणांत लिहिलेल्या सिद्धांतावर किंवा पूर्वरंगावर आधारलेला हा उत्तररंग आहे.शक्य तितकी स्वानुभवाची उदाहरणे द्यायची.वाचलेली किंवा ऐकलेली उदाहरणे शक्य तितकी टाळायची.'एक तरी ओवी अनुभवावी' हा ध्यास धरून मला आलेल्या अनुभवांचा मी लावलेला अन्वयार्थ हा या उत्तररंगाचा आधार आहे.
सुरवंटाचे फुलपाखरू ६१