पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हातात घेतो ते यशस्वी होतेच होते. यासाठी श्रद्धेने व सातत्याने समंत्रक सूर्यनमस्कार घालणे गरजेचे आहे. मणिपूर चक्र स्थान निश्चिती व महत्त्व तक्ता क्रमांक तीस चक्राचा रंग निळा चक्राचे स्थान नाभी केंद्र चक्राचे अधिष्ठान अग्नी शरीरावर परिणाम डोळ्यांची दृष्टी, विचारांचा दृष्टीकोन प्रभावित अवयव डोळे, मेंदू. मणिपूरचक्राला नाभी चक्र असेही म्हणतात. नाभीस्थान हे आपले शरीर घडविण्याचे आरंभ स्थान आहे. याचेच दुसरे नाव सूर्यचक्र असे आहे. या चक्राचे अधिष्ठान आहे अग्नी. आपल्या शरीरातील जठराग्नी सर्वात महत्त्वाचा. तो आपल्याला त्याच्या अस्तित्वाची आठवण दिवसातून किमान तीन वेळा करून देतो. हा जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो. अन्नातील पोषक द्रव्ये सर्व शरीरभर पाठवितो. या पोषक घटकांमुळे शरीराचे संवर्धन-संरक्षण होते. स्नायूंचे पोषण सतत व्हावे, त्यांना उर्जेची कमतरता भासू नये म्हणून ठराविक मध्यंतरानंतर वारंवार भूक, पचन व संवर्धन ही प्रक्रिया सातत्याने चालू असते. मणिपूर जोम- ताकद, आनंद- चक्राच्या अविश्रांत श्रमामुळेच आपण संपूर्ण आयुष्य उत्साह यामध्ये जगू शकतो. 22 शरीरातील अग्नी तत्त्व थोड्या प्रमाणात जरी वाढले, ताप आला तर कोण धावपळ, केवढा खर्च, किती औषधे? याचा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे. हे संकट टाळण्यासाठी आपल्या शरीरातील मणिपूर चक्राची (अग्नी तत्त्वाची) माहिती करून घेऊ. त्याचा उपयोग सूर्यनमस्कारामध्ये करून आपले नित्यकर्म अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करू. 22 - - - उन्हाळा व हिवाळा हे दोन ऋतू आहेत. पाऊस हा या दोन ऋतूंचा परिणाम आहे. पृथ्वीच्या तापमानात वाढ होते आहे. जगातील सर्व शास्त्रज्ञ चिंताग्रस्त आहेत. मातृभूमिला औषध-उपचार सुचवित आहेत. पर्यावरण हा परवलीचा शब्द वारंवार कानावर पडतो आहे. सूर्यनमस्कार एक साधना ३७