पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
१०३
 

 इ. स. १००१ साली गझनीच्या महंमदाने भारतावर स्वारी केली व तेव्हापासूनच भारताच्या स्वातंत्र्याला ग्रहण लागले आणि हळूहळू त्याचा खग्रास झाला. येवढे भीषण आक्रमण आल्यावरही हिंदूंनी त्याची कारणमीमांसाही केली नाही. ती ऐपतच त्याच्या बुद्धीला राहिली नव्हती. त्यामुळे विघटनेच्या विषवीजांचे तर त्यांनी निर्मूलन केले नाहीच, उलट निवृत्तिसाद, कर्मकांड, व्यक्तिनिष्ठ धर्म, पंथस्तोत्र इ. नवीन विषवीजांची त्यांत भरच घातली. यामुळे मूळच्या व्याधी जास्तच विकोपाला गेल्या. त्या खग्रासग्रहणातून अजूनही भारताचा मोक्ष झालेला नाहीं. पारतंत्र्याच्या या प्रदीर्घ घोर अंधःकारयुगाचे- त्यातील स्वातंत्र्यप्राप्तीचे प्रयत्न, त्यातील यशापयश, त्यामागली संघटना, त्यामागचे तत्त्वज्ञान यांचे आता विवेचन करावयाचे आहे. पुढील प्रकणाचा तोच विषय आहे.

§