दिसतात. युरोप व अमेरिका ह्या दोन्ही खंडांतील अति
विद्वान् मुत्सद्द्यांचा म्हणण्याकडे लक्ष न देतां इंग्लिशांनी
मूर्खपणानें वसाहतींवर आपले हक्क बजाविण्याचा हेका
वरिला व त्याचा असा परिणाम झाला. म्हणून ह्याप्रमाणें
मूर्खपणा पुन्हा कधीं करावयाचा नाहीं. हीच महत्त्वाची गोष्ट ह्या इतिहासापासून त्यांना
शिकावयाची आहे.
ह्या वसाहतींना पुन्हा ताब्यांत आणण्यासाठीं
इंग्लिशांनी भगीरथ प्रयत्न केले; परंतु वसाहतींना फ्रेंच
लोक व स्पेन देशांतील लोक ह्यांची मदत असल्यामुळे
इंग्लिशांची खटपट फुकट गेली. इंग्लिशांनी त्या दोघांचेंहि
नुकसान केलेच होतें; व त्यामुळे इंग्लिशांचें उट्टे काढण्यास
ते अगदी संधीच पाहत होते; व म्हगनच त्यांनी इंग्लिश
वसाहतींतील लोकांस मदत केली. वेस्त इंदीज वेटें देखी-
ल इंग्लिशांच्या हातून जावयाचींच; परंतु समुद्रामध्यें
राइने येथील लढाईत त्यांना जो एक जय मिळाला,
तेवढ्यामुळे हीं बेटे मात्र त्यांच्या हातून गेली नाहीत.
ह्या युद्धामुळे १०,००,००,००० पौंड कर्ज वाढलें; व
१७८३त हें युद्ध संपले. तेव्हां त्यांच्या ताब्यांत
कानडा व नोवा स्कोशिया, वेस्त इंदीज बेटांपैकी त्यांच्या
ताब्यांत जीं बेटें होती ती, आफ्रिका खंडाच्या किनाऱ्या-
वरील थोड्या बहुत जागा, व जिब्राल्तर इतकी ठिकाणें
मात्र त्यांच्या ताव्यांत राहिली. हिंदुस्थानासंबंधी विचार
मागें झालाच आहे.