इंग्लंदच्या हातून गेल्याने ब्रिटिश " व्यापाराचा
हास" होणार आहे. "व्यापाराचा हास" असे म्हट
ल्याबरोबर जी भयंकर स्थिति मनांत येते, त्याहून अधिक
भयंकर स्थिति दुसऱ्या कोणत्याहि गोष्टीनें मनांत यावयाची
नाहीं. ब्रिटिश व्यापाराचा म्हास झाल्यानें इंग्लदांतील
गिरण्या बंद पडतील, पदार्थांच्या किमती वाढत जातील
आणि जिकडे तिकडे लोक दुःखी व असंतोषी होऊन
त्यांतून सुटका होण्याचेहि उपाय राहणार नाहीत.
ब्रिटिश वसाहतींची स्थिति काय आहे व त्या
त्यांनी आपल्या ताब्यांत कां राखिल्या
पाहिजेत ह्याविषयीं थाडक्यांत येणेप्रमाणें
वसाहती निरंतर
ताब्यांत कशा
राखाव्या.
हकीगत झाली. "त्या त्यांनी ताव्यांत कशा
रखाव्या" ह्याविषयीं एक दोन गोष्टी आतां सांगावया-
च्या आहेत. अनेक देश जर केवळ राजकीय संबं
धानें एकत्र असतील, व त्या सर्वांमुळे जें एक राष्ट्र
बनतें त्या राष्ट्राविषयींचा खरा अभिमान जर
त्यांच्या ठिकाणी नसले, तर नुसत्या राजकीय संबंधाच्या
त्यांच्या ऐक्याची कांहींच किंमत नाहीं असें म्हणण्यास,
प्रत्यवाय नाहीं. ब्रिटिश राष्ट्र हल्लीं दोन्ही दृष्टीनें एकत्र
आहेच; म्हणून ते एकत्र कसे करावें, हा प्रश्न आपणां-
पुर्दे हल्लीं नाहीं; तर त्याचें ऐक्य कायम कसे राखावें,
हा आहे. हे ऐक्य कायम राखणे ही गोष्ट, इंग्लंदांतील
लोकांच्या वर्तनावर मुख्यत्वें अवलंबून आहे, असें म्हण-