आलें. हिंदुस्थानांत एकी नाहीं, ही गोष्ट ह्या बंडाच्या
इतिहासावरून स्पष्टपणे दिसून आली.तसेच, ह्या
देशांत अनेक जाति व धर्म असल्यामुळे " राष्ट्र " ही
संज्ञा ह्याला देतां येत नाहीं; भूगोलविषयक दृष्टीनें मात्र
पाहिजे तर ह्या देशास राष्ट्र म्हणतां येईल, ही गोष्टाह
ह्या बंडामुळे चांगली कळून आली.
ह्या बंडामुळे एक मोठा परिणाम घडून आला.'
तो कोणता म्हणाल, तर फारा दिवसांची जी ही ईस्त
कंपनीचा इंदिया कंपनी तिचा शेवट. जिच्या संबंधानें
शवट. एवढा मोठा इतिहास झाला, व जिनें आजपर्यंत
इतक्या उलाढाली केल्या, ती कंपनी ह्या बंडामुळे मोडली,
आणि तिचा अधिकार ह्यापुढे प्रत्यक्ष इंग्लंदच्या राजा-
कडे गेला. हिंदुस्थानाशीं फक्त ह्या कंपनीनेंच व्यापार
करावा, अशी जी सनद कंपनीला मिळालेली होती, तिची
मुदत संपून बरींच वर्षे झालीं होतीं, व आतां तिचा राज्य-
कारभाराचाहि अधिकार गेला. ही जी व्यवस्था झाली ती
सर्वांस हितावहच होती.
ह्या बंडामुळे घडून आलेली आणखी एक मह-
त्त्वाची गोष्ट अद्यापि सांगावयाची आहे. आरंभी आरं-
भींच्या मोगल बादशहांनंतर सर्व हिंदुस्थान एकछत्री
राणी “एंप्रेस” अमलाखालीं कधीं आले नव्हतें, तें कंप-
असा किताब घेते. नीनें उत्तम रीतीनें आपल्या अमलाखाली