पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५२ )

आणिलें त्या मोगल घराण्यांतील शेवटच्या बादशहांच्या हातीं राज्यसत्ता कांहींच राहिली नव्हती; तथापि त्यांचे पूर्वीचें वैभव अगदींच नष्ट झालें नव्हतें; व ते नामधारी बादशाह होतेच. परंतु ह्या बंडामुळे मोगल घराणें अग- दींच लयास गेलें; व कांहीं वर्षेपर्यंत हिंदुस्थानांत नामधा- रोहिं सार्वभौम राजा नव्हता. परंतु इ. स. १८७७ ही स्थिति बदलली. ह्या वर्षी राणीनें “हिंदुस्थानची बाद- ग्राहिण" ( एंप्रेस ऑफ इंडिया ) अशी पदवी धारण केली; आणि दिल्लीच्या बादशहांच्या दुर्बलतेमुळे जी सत्ता त्यांच्या हातून गेली, ती इंग्लिशांनी मिळविली असून मी इंग्लिशांची राणी असल्यामुळे ह्यापुढे त्यांच्या वतीनें ती सत्ता मी आपल्या हातीं घेतली आहे, व माझ्या २५ कोटि प्रजेवर ह्यापुढें न्यायानें व दृढनिश्चयानें राज्य कर- ण्याचा ठराव केला आहे, अशा अर्थाचे जाहीरनामे देशांत सर्वत्र लागले.
 कंपनीच्या एकंदर इतिहासांत पुढील सन विशेष लक्षांत ठेवण्यासारखे आहेतः - १७४८; १७७३; १७९३; १८१३;१८३३ व १८५३. कंपनीच्या राज्यसत्तेस १७४८त आरंभ झाला; १७७३त रेग्युलेतिंग आक्ट पास होऊन सांप्रतचें “ ब्रिटिश हिंदुस्थान " बनण्यास प्रारंभ झाला, व कंपनीच्या अधिकाराची मुदत २०१२० वर्षांची ठरली; व १८१३,१८३३ आणि १८५३ ह्या वर्षी तिच्या सनदांत कांहीं फेरफार होत