हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्
चतुःसीमा, ज्याला द्यावयाचे त्याचें नांव व कामगिरी आणि दिल्याची
तारीख एवढीच माहिती त्या वेळीं देत नसत; त्यामुळे पुष्कळ ऐतिहासिक
माहिती मिळूं शकते. देवगिरीचा प्रधान 'हेमाडपंत' ह्याने लिहिलेल्या
धार्मिक ग्रंथांतून'यादव' राजघराण्याचा बराच • इतिहास आला
आहे.
'कल्हण ' नांवाच्या गृहस्थाने 'राजतरंगिणी' म्हणून काश्मीर देशाचा
इतिहास लिहिण्याला इ० स० ११४८ मध्ये सुरवात केली व तो पुढेही
जोनराज, श्रीवरपंडित, व प्राज्यभट्ट ह्या गृहस्थांनी क्रमाक्रमाने लिहून
सोळाव्या शतकांत पूर्ण झाला ! सतत चारशे वर्षे निरनिराळ्या लोकांनी
आस्थापूर्वक प्रयत्न करून आपल्या प्रांताचा इतिहास लिहिणें ही गोष्ट
कौतुकास्पद तर आहेच; शिवाय त्यामधील चिकाटी व सहकार्य हे गुण
अनुकरणीय आहेत. बिल्हण कवीचें ' विक्रमांकदेव चरित्र, बाणभट्टाच
'हर्षचरित्र, 'चंदकवीचा 'पृथ्वीराजरासा, ' हंभीर महाकाव्य, खोम्माण-
रासा, ' पृथ्वीराजविजय, ' ' कीर्तिस्तंभप्रशस्ति, आल्हाखंड' इत्यादि
ग्रंथांवरून पंजाब, काश्मीर, राजस्थान, बुंदेलखंड वगैरे प्रांतांचा बराच
इतिहास मिळतो.
रजपूत लोकांत वंशावळी व ख्याति लिहून ठेवण्याचा फार प्रघात असे.
बिकानेर व जोधपूर राज्यांत असे विस्तृत 'ख्याति - इतिहास ' लिहिलेले
आढळतात. जोधपूरच्या जसवंतसिंह राजाचा दिवाण 'मुहिणोत नैणसी '
हा शूर, मुत्सद्दी व इतिहासाचा अभ्यास होता. तो दिवाण असल्यामुळे
मोठमोठ्या रजपूत व मुसलमान सरदारांशीं त्याचा विशेष परिचय असे.
त्यांजकडून व भाट - चारण अशा दरबारी लोकांकडून व ठिकठिकाणच्या
जुन्या ख्याति, लेख इत्यादि अनेक साधनांवरून त्याने आपला एक बृहत् -
संग्रह तयार केला. त्यावरून १५-१६ व १७ व्या शतकांतील राजस्थानचा
चांगला इतिहास समजतो. म्हणून पं० गौरीशंकर ओझा ह्यांनी 'मुहिणोत