या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१८]

}

{[gap}}अॅडाम स्मिथचा ग्रंथ पंचपुस्तकात्मक आहे. राष्ट्रीय संपति ही राष्ट्रांतील वार्षिक श्रमाचें फळ आहे, या विधानापासून पहिल्या पुस्तकाला प्रारंभ केलेला आहे. या विधानानें अॅडाम स्मिथनें उदीमपंथ व निसर्गपंथ ह्या दोहोंपासून आपल्या मीमांसेचा फरक दर्शविला आहे. उदीमपंथानें पैसा व परकी व्यापार हीं संपत्तीचीं मुख्य साधनें आहेत असें प्रतिपादन केलें होतें; तर निसर्गपंथानें शेतकीला सर्व संपत्तीची जननी केलें होतें. ह्या दोन्ही पंथांचा एकतर्फीपण दाखविण्याकरितां व आपल्या मीमांसेचें संपूर्णत्व स्थापन करण्याकरितां संपत्तीचें तिसरें उपेक्षित कारण मानवी श्रम होत असें प्रतिपादन करून स्मिथनें अभिमत पंथांतील कारणात्रयीचा संप्रदाय पाडला
 राष्ट्रीय संपत्तीचीं भांडवल, जमीन व .श्रम अशीं तीन कारणें आहेत, हें त्यानें प्रथमतः दाखविलें आहे व मग श्रमाच्या ज्या एक विशेष गुणावर संपत्तीची कमीअधिक वाढ अवलंबून आहे त्याचें विशेषतः वर्णन कलें आहे. श्रमाचा हा गुण म्हणजे श्रमविभागाचें तत्व होय. अॅडाम स्मिथनें अर्थशास्त्रामध्यें या तत्वाचा एक नवा शोधच लाविला असे म्हणण्यास हरकत नाहीं. समाजांत श्रमविभागाचें तत्व सुरू झालें म्हणजे प्रत्येक माणसाच्या ब-याच गरजा दुस-याकडून भागविल्या जातात, म्हणून मालाच्या अदलाबदलीस सुरुवात होते व ही अदलाबदल सुलभ रीतीनें होण्याकरितां विनिमयसामान्य म्हणून पेसा आस्तित्वांत येता. तसेंच मालाची अदलाबदल मालाचें मोल ठरल्याखेरीज होत नाही. मालाच्या मोलाचें खरें प्रमाण म्हणजे तो माल उत्पन्न करण्यास लागणा-या श्रमाचें परिमाण होय. सारख्या परिमाणाच्या श्रमाची किंमत सर्व काळीं व सर्व ठिकाणीं सारखीच असते. सामान्यतः पदार्थाचे मोल पैशामध्यें मोजलें जातं व त्यालाच पदार्थाची किंमत म्हणतात. पैशाला उत्तम वस्तु म्हणजे सोनेंरूपें, कारण त्यांचें मोल सहसा बदलत नाही. समाजाच्या प्रथमावस्येंत वस्तूची किंमत बहुतांशीं श्रमावरच अवलंबून असते. परंतु समाजाच्या परिणतावस्थेंत किंमतीमध्यें तीन घटकावयव असतात. भाडें अगर खंड, मजूरी व नफा. जमीनदाराला भाडें मिळतें. कामगारांला मजुरी मिळते व संपत्ति उत्पन्न करणाराला नफा मिळतो. समाजाची संपत्ति ज्या प्रमाणानें वाढते, त्या प्रमाणानें भाडें व मजुरी वाढत जातात,