भोंडल्याची गाणी/कोथिंबीरी बाई

कोथिंबीरी बाई गं
आता कधी येशील गं
आता येईन चैत्र मासी
चैत्रा चैत्रा लवकर ये
हस्त घालीन हस्ताचा
देव ठेवीन देव्हा-या
देव्हा-याला चौकटी
उठता बसता लाथा-बुक्की

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.