"दत्ताची आरती/ कृष्णापंचगंगासंगम निजस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ... |
(काही फरक नाही)
|
१९:४८, १३ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती
<poem>
कृष्णापंचगंगासंगम निजस्थान । चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमना । तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण । विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥
जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता । नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥
वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान । मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥ वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन । अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ जय. ॥ २ ॥
शुक्लाकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही । कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥ अभिनव महिमा त्याचा वर्णूं मी कायी । म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ जय देव. ॥ ३ ॥
दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि । आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥ आठहि ग्रामीं भिक्षा केली तद्दीनीं । निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानीं ॥ जय. ॥ ४ ॥
ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले । भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥ अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले । गंगाधरतनय सदा वंदी पाउलें ॥ ५ ॥
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |