धरीत्रीच्या कुशीमधीं

धरीत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं
व-हे पसरली माती जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं अंगावरतीं शहारे

ऊन वा-याशीं खेयतां एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी
कसे वा-‍यानं डोलती दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी !


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.