भातुकली. २६१ द्दल तुला मी दोन मोहरा देतो. उमाकांता, तूं वि- ठोबाच्या झटल्याप्रमाणे वागलास, झणून मी तु- लाही कांहीं देईन. लढाई. शेख महंमद ह्मणून लढाऊ गलबताचा कोणी नामां- कित सरदार वयातीत होता; त्याने समुद्रांतील लढाया वगैरे जिवावरची संकटे फार अनुभविली होती; शेवरी तितक्याही आधानांतून पार पडून आपल्या कुटुंबांत मुरक्षित येऊन पोहोचला; नंतर कुटुंबाची माणसें पा. हून आनंदाचे भराने त्यास गहिवर आला. त्या काळी न्याचे मुलांनी गलबत तुफानांत सांपडल्यांचे व पाण्यां- त लढाई कसकशी झाली ह्याचे सर्व वर्तमान विचारि. लें. तेव्हां त्याने लढाईचे वर्तमान व समुद्रांत जी जी घोर संकटें त्यास प्राप्त झाली होती ती सविस्तर सां- गितली, व देशोदेशांतील चाली व मुखदुःखेंइत्यादि ज्या ज्या ठिकाणी जे जे पाहिले होते तेंही सर्व सांगितले. तो त्या गोष्टी सांगत असतां असा काही चमत्कार झा. ला, की त्या गोष्टी ऐकता ऐकतां त्याच्या मुलीचा कठ दाटून येई, आणि तिच्या नेत्रांवाटे खळखळां अश्रुपात चालत, आणि ती श्वासोच्छ्रास टाकीत उर्गाच रा. ही; परंतु त्याचा मुलगा रुस्तुमनामें होता त्यास आवे. श येई, तेणेकरून त्याच्या बाह्या फुफुरत व भोंवया बाळमित्र. चढून जात. जसे कोणी हाणेल की, हा कोणी मोठा लढाई खेळणारा पुरातन शूर आहे. मधूनमधून जेव्हां लढाईच्या गोष्टी निघत तेव्हां त्यास अधिक अधिक शौर्याचा आवेश येई. मग आपल्या बापास ह्मणाला, मी जर तुह्मांइतका मोठा असतो तर लढाई खेळावया• स फार आनंदाने निघतों, मग मलाही वाहवा मिळती. शरख०- तूं अशा नाशकारक आणि दुःखकारक कामाची इच्छा कां करितोस ? ते तुला माहात तरी आहे. रुस्तु०- पण, बाबा, तं मला शिपाई करणार आ सना शेख०- होय, तूं ह्मणतोस ती गोष्ट खरीच, रुस्तु-पण शिपायाची चहा तरी पुष्कळ आहे शेव०- चहा आहे खरी, हे मी जाणतो, पण असे आहे; जसें मनुष्याचे शरीर तसाच राजाचा मुलूख, ह्या दोहोंला आतल्या बाहेरल्या रोगांची पीडा सा- रखीच आहे. पहा ! पोटांत कांहीं रोग उत्पन्न न व्हावा व बाहेरून थंडी वारा किंवा घाव गळं व- गैरे ह्यांकडून शरीराचा नाश न व्हावा ह्मणून वै- द्याचा आश्रय करावा लागतो, त्याच न्यायक- रून मुलखाला आंतील रोग, मणजे फंद फितूर, आणि बाहेरील रोग झणजे शत्रु, ह्यांच्या बंदो. बस्ताकरितां शिपाई ठेवावे लागतात. रुस्तु०- तर मग, बाबा, शिपाईलोकांची गरज फार लढाई. २६३ आहे. असें आहे तर, मी शिपाई होईन ही माझी हर इच्छा वाईट आहे काय? व०- पण वैद्याची वासना खोटी असते; सर्वदा लोकांस रोगराई असावी ह्मणजे आपणास पैसे मि- ळतील ही इच्छा ते करीत असतात; तर हे बरें की काय रुस्तु- छी, छी, ते तर अगदी वाईट. शेख०- तर तशीच शिपाईलोकांची इच्छा असते, ते ह्मणतात की कोठे तरी लढाई असावी, ह्मणजे आमचा रोजगार पिकला; मग तिकडे कांही असो; यास्तव मी त्यांची स्तुति करणार नाही. रुस्तु०- तरी पर, बाबा, राजास लढाईचे अगत्य । आहेना। शेख०- कशास पाहिजे ? काय कारण रुस्तु-राजाची जशी लढाईत फते होत जाईल ते. सातसा आनंद आणि हितच होईल. शेख०- कधी कधी लढाईची गरज असली तर असा, पण दुसन्याचा मुलख चांगला पाहिला हाणून तों घ्यावयास जर राजा इच्छील तर ते तुला नीट वाटेल की काय? आतां घटकाभर आपल्या भो- ताली पुष्कळ गांव आहेत, त्यांचे अधिकारीही वेगळाले आहेत. तेव्हां मी आपले गांवांतील लो. क मिळवून ते चांगले गांव ह्मणून जर मी घ्याव- यास जाईन तर मग तेही आपले लोक घेऊन बाळमित्र. लढाईस उभे राहतील, आणि कदाचित ते मादो घ्यावयास जरी यत्न करतील तरी ते चांगले की काय ? रुस्तु०- त्यांनी तसे केले तर ह्यांत आश्चर्य काय । शेरब.- असे झाले असतां मग मला किती दुःख उ. त्पन्न होईल बरें: मला आपला माल सांभाळावया- स किती खबरदारी ठेविली पाहिजे . शेवटी त्याचा परिणाम कसा तो पहा: जर मी जितलो तर ते सर्व मला एखादे वेळेस पेंचांत आणावयास जपत राहतील, बरें, मी जर हरलो तर ते सर्व मिळून मला लुटून घेतील. रुस्तु०- लढाईचे अगोदर अशी फौज तयार करून ठेवावी की आपण प्रतिज्ञेनें शत्रूस जिवूच जिंकू. शेख०- तूं ह्मणतोस ते खरे, पण शत्रूनेच मजपेक्षा चांगली फौज बाळगून उलटी माझीच दुर्दशा केली तर मग कसे होईल ? आतां मीच तुला बोलण्यां. त थकविले. तुझ्या बोलण्याप्रमाणे जरी माझा जय होऊन मुलूख वाढला तरी तुझे बोलणे माझे नाशास कारण होईलच. रुस्तु०- असे कसे ह्मणतां, बाबा ९ जसा जसा मुलूख वाढेल, तसे तसे द्रव्यही अधिक मिळेल. शेख०- तसे नव्हे, बेग, मुलखाचा मोठेपणा किंवा लहानपणा हा कांहीं द्रव्य अधिक मिळण्यास कारण नव्हे. त्याचे मुख्य कारण मुलखाची आ. भातुकली. २६५ वादानी राखणे हे आहे. रुस्तु०- शत्रूपासून घेतलेल्या मुलखाची लावणी क- रता येणार नाही की काय ९ लावणी करावयास काय कठीण आहे ? शेख- कठीण नाही खरे, पण लढाईच्या भयाने कां. ही लोक परागंदा होतील, व बखेड्यामुळे किती. एक परमुलखांत उठून जातील. मग मुलखाची लावणी होऊन आबादानी कशी राहील १ आणि बाकीचे जे रयतलोक शेतकरी राहतील त्यांपासून खबरदारी ठेवणारे लोकांच्या खर्चासाठी वसूल अ- धिक घ्यावा लागेल; ह्यामुळे कुणब्यांचे बैलढोर सारे विकावे लागेल, तेव्हां त्रासून त्यांस दुसऱ्या मुलखांत जाणे प्राप्त पडेल; आणि जुलमामुळे हैं राज्य कधी बुडेल असें देवापाशी ते मागतील, व जागी जागी बंडे माततील रुस्तु०- खरी गोष्ट, बाबा, असें म्यां फारवेळां बखरी- त वाचले आहे. शेख०- तर, पहा, मज भोंवताली जो राजाचा मुलूख आहे त्यांतील लोकांवर काही जुलूम नकरितां स- वदागिरी अशी करीन की, जेणेकरून त्यांचे व माझें हित होईल. तंट्या बखेड्यांत व फंदफितूरां. त नपडतां जपून वागलों, व व्यापार वाढवून सर्व लोक सुखी केले तर रावपणाचे बढाईने जे सुख २३ २६६ बाळमित्र. मिळायाचे त्यापेक्षा अशा कामाने अधिक मिळणार नाही की काय१राजा फारवाढू लागला तर शक्ति हीन होतो, कारण मुलखाची खराबी फार होते. रुस्तु०-पण, बाबा, तुहीं आतांच सांगितले की, रा- जाचा मुलूख व शरीर एक सारखेच आहे, तर ज- स जसें शरीर वाढते तसतशी शक्ति अधिक येती, ह्या न्यायाने जसजसा मुलूख वाढेल तसतसा राजाही शक्तिमान व्हावा की नाही ? शेख.- तूं ह्मणतोस ते ठीकच आहे. शरीराप्रमाणे दि. वसें दिवस राजा वाढत गेला तर बरेंच आहे, प. रंतु तसे होत नाही. रुस्तु०- मला ह्या शेवटल्या गोष्टीचा अर्थ उघड क. रून सांगा. शेख०- मी आतां एके दाखल्यावरून तुझ्या मनांत - भरवितों, ऐक. एक मुलगा व एक मुलगी ह्या दो- घांमध्ये कशी गोष्ट झाली ती पहा! रुस्तु०- येथे मुलगामुलगीचे काय कारण आहे ? शेख.- अरे, दृष्टांतासाठी सांगतो. एक्या बायकोस एक मुलगा व एक मुलगी होती; त्यांत मुलगी अंमळ लहान होती व मुलगा अंमळ मोठा होता; त्यांचे आईने एके दिवशी दोघांस भाकर सारखीच दिली, तेव्हां त्या मुलाने मुलीची भाकर हिसका. वून घेतली. हा अन्याय त्याने कां केला बरें? रुस्तु.- त्याचे मनांत आले असेल की, बहीण मजभातुकली. २६७ पेक्षा लहान, असे असतां हिला माझे इतकी भाक- र कशी दिली, ह्मणून त्यास वाईट वाटले असेल. शेख.- तसेच लढाई करणारे जे लोक आहेत ते सर्व अशीच कारणे शोधीत असतात; पहा त्या मुलाचे आईने त्यास त्याच्या आहाराप्रमाणे बेताची भा. कर दिली असता त्याने जबरदस्तीने तिची भाकर हिरावून घेऊन अधिक खाल्ली, तेव्हां त्या भाक. रीच्या योगाने त्याचे बळ अधिक व्हावें की ना. ही १ राजास अधिक मुलूख मिळाला असतां त्याचे बळ अधिक व्हावें खरें, परंत जसे त्या पोराने प्रमाणापेक्षा अधिक खाल्लं असतां तेणेकरून त्याचे बळ अधिक नहोतां अजीर्ण होऊन मोडशी झाली, तशीच राजाची अवस्था होत असते. जर तो आ- पलीच भाकर खाऊन राहता तर त्याची प्रति बरी असती. आतां तशा दुरवस्थेत त्याची बहीण सूड घेण्याकरिता जर त्याची भाकर घेती तर आ- पली भाकर सांभाळाया पुरते त्याचे आंगी साम- र्य नसते. रुस्तु०- पण त्याचे मनांत असें येते की, अगोदर म्यां हिची भाकर घेतली आहे तेव्हां मीही आतां सं. तोषाने हीस घेऊ देईन. शरव०- असे पहा, ज्यांस लोभ आहे ते अशा नी. तीने कधीही वागणार नाहीत; कारण की त्यांचे मनांत जर अशी नीति येती तर ते प्रथमच लंढा. बाळमित्र. ईची मसलत नकरिते. मला असे वाटते, की लढा. ईचे काम फार वाईट आहे. असें राजाचे मनांत सदा सर्वदा वागावयाविषयी एक उपाय हाच, की ज्यांस पति नाही अशा स्त्रिया, व ज्यांस बाप नाही ह्यामुळे अन्नाकरितां भयां भयां करीत हिं. डतात अशी पोरें, ह्यांची अनेक प्रकारची दुःखें त्यांचे अंत:करणांत निरंतर राहिली पाहिजेत; म- णजे निर्दय पापी पुरुषांची मसलत राजा ऐकणार नाही. नाहीतर त्यांच्या मसलतीने हजारों गरी. बगुरीब फुकट चेंगरले जातात. जे उत्तम राजे आहेत ते सर्वदा प्रजेचे हिताकडे लक्ष ठेवतात, व त्यांचे मन प्रजा आबाद असावी इकडे असते. मुलखाची आबादी होण्यास फार दिवस लागतात, पण नाश होण्यास एक क्षण देखील नको. नाश झाला असतां मलखांतली शेते पडतात, व कोणास रोजगार राहत नाही, ह्यामुळे व्यापार अगदी बु- डतो. असें होतां होतां शेवटी राजाही बुडून जातो. रुस्तु०- पण, बाबा, म्यां असें ऐकिलें आहे की ल. ढाईच्या प्रसंगी लोकांस द्रव्य पुष्कळ मिळते. शेख.- द्रव्य पुष्कळ मिळतें ह्मणूनच भारी नाश हो- तो. द्रव्याचे मदाने ते लोक अविचारास प्रवृत्त होऊन पुढे कसे होईल ह्याचे भान नठेवितां न्या द्रव्याचे योगाने सर्वदा ख्याली खुशालीत निमग्न होतात, ते पाहून जे अल्प द्रव्यवान आहेत त्यांभातुकली. चेही मनांत तसेंच करावें असें येते. मग ते अशा दुराचरणाने आपले द्रव्य थोडक्याच दिवसांत उ. धळून टाकितात तेव्हां अंमळसे त्यांचे डोळे उघडूं लागले झणजे जे शेष द्रव्य राहिले असेल तें अं. धिक वाढवावे ह्याबुद्धीनें कांहीं एक अचाट कल्प. ना काढून साहसकर्म करावयास जातात; शेवटी तीच कल्पना त्यांस सफाई बुडवून टाकिते. अशी. ही देखतभूल पाहून इतरलोक मनांत समजतात की, त्यांच्या करण्यांत कांहीं चूक पडली ह्मणून ते बु- डाले; आझी चांगल्या हातोटीने करूं, असें ह्मणून ते आपण त्याप्रमाणे करावयास जातात; शेवटी न्यांचीही गति तीच होते. जसे हातांत मशाल घे. ऊन पाण्यांत उडी घालणारे ते कधीच बुडाल्यावा. चून राहत नाहीत, तसे ते लोक आपण बुडून दुसऱ्यास बुडवितात. असा एक की काय ९ सर्व एकाच माळेला ओंवावे असे फार आहेत. मुलखा- त ज्या द्रव्याच्या योगाने व्यापार चालावयाचा तें द्रव्य त्या दिवाळखोर लोकांच्या हाताने लयास गेल्यामुळे अर्थात मुलखांतला व्यापार बुडतो. रुस्तु.- बरे तर, सल्याने जे द्रव्य मिळविलें त्यास- ही अपाय आहे? शख०- नाही, नाही, तसें नाहीं, घातपातादि दुष्क. माने जे द्रव्य मिळवावें त्याची मात्र तशी अवस्था होते; आणि यथान्यायेंकरून निढळच्या घामाचे बाळमित्र. मिळविलेलें जें द्रव्य तें पिढोपिढी राहून त्यापासून पुण्य जोडते. राज्यांत बखेडा वगैरे उपद्रव नस- ल्याने रयतेवर जुलूम होत नाही, ह्मणून आबादी असते; कारण की व्यापारी व कसबी व गुणी ह्यांची चहा राजास असती, ह्यामुळे त्यांस जें द्रव्य मिळते ते शेतकरी लोकांकडे पुन: येते. अशा द्र. व्याच्या फिरण्याने सर्व लोक सुखी असतात. हे पाहून दुसरे राज्यांतील रयत लोक ह्या मुलखा- ची प्रशंसा करितात, व आपला मुलख सोडून इ. कडे येतात, तेव्हां जिकडे तिकडे आबादानी व आनंद होतो. सर्व मुखी असल्याने अधर्म बुडून राजास मुख मिळते, मग राजाने इतकेंच मात्र रा. खावें की कोठे अन्याय होऊ देऊ नये. रुस्तु.- तुमचे बोलण्याचे हांशील मला समजलें, प. ण लढाई कोठेच नसली तर मग शिपायाची गरज काय आहे ५ मी तर शिपाई होईन ह्मणतों, तो अ. गोदरच फौजेस फांटा होईल. शेख०- अरे थांब, थांब, रुस्तुमा ! इतक्यांतच तर्क बांधू नको; अरे,जर अगदीच फौज नसली तर दु- सऱ्या राजास वर्तमान कळून तो लागलाच चढाई करून येईल, आणि राज्य घेऊन मुलखाची खरा. बी करील. याजकरितां जरी सल्ला आहे तरी ने. हमी फौज बाळगून पोसली पाहिजे, ह्मणजे तीतील शिपाई लोक समयास प्राण देतील; नाही तर को. भातुकली. २७१ ण मरणार आहे १ लढाई नसली तरी मुलखाचे बंदोबस्तासाठी जागी जागी कांही कामें योजन फौज ठेविली पाहिजे. मी तरुणपणांत फार वेळां लढाया करून आपले धन्याचे हित केले आहे. परंतु आतां आपले वतनाचे गांवावर राहून त्या- चा बंदोबस्त मात्र राखीन, आणि मुलांस विद्या- भ्यास करवीन, आणि लढाईमध्ये जें जें पाप केलें आहे त्यावरचे आतां गरिबांगुरिबांचा सांभाळ करून त्यांस सुख देईन. इतकें झालें झणजे अंत- काळी कांहींच इच्छा राहणार नाही, आणि ह्या मृत्युलोकांत योग्य वर्तणूक केली अशी माझी सर्वां- त वाहवा होईल. रुस्तु- बाबा, तुझी बोलतां हे ठीकच आहे; परंतु इ. तर लोकांच्या मनांत असें कोठे येते शेख०- ह्याचे कारण असे आहे की ते आपले वडि- लांचे चालीप्रमाणे चालतात, त्यांस कोणी सुरीति शिकवू लागल्यास ते त्याचे ऐकत नाहीत; कांकी त्यांचे आईबापांनी जे त्यांस शिकविलें आहे तेंच त्यांचे मनांत राहते, त्यांस दया, शांति इत्यादिक सद्गुण कोणी विद्वान शिकवू लागल्यास ते त्याचा अनादर करितात. ह्याकरितां ह्या गोष्टीचा बाळाभ्या- स असला पाहिजे;कांतर कुंभाराचे मडके ओलें असतां जसे वळवावें तसे वळते. ह्यासाठी ज्याला लहान- पणापासून उत्तम शिक्षा असती तो स्वतां योग्य