आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोनी,
आडात पडली मासोळी,
आमचा भोंडला सकाळी.१.
आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोनी,
आडात पडली सुपारी,
आमचा भोंडला दुपारी.२.
आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोनी,
आडात पडली कात्री,
आमचा भोंडला रात्री.३.
आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोनी,
आडात पडला शिंपला,
आमचा भोंडला संपला.४.

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.